Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NEET Paper Leak Update: NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रात! तपासात मोठा ट्विस्ट; CBI कडून विशेष पथक तैनात

NEET Paper Leak Update: NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रात! तपासात मोठा ट्विस्ट; CBI कडून विशेष पथक तैनात

NEET Paper Leak Update: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात एक खळबळजनक वळण मिळाले आहे. सुरुवातीला या गैरप्रकाराचा उगम राजस्थानमध्ये झाल्याचा संशय होता, मात्र तपास यंत्रणांच्या ताज्या निष्कर्षांनुसार, परीक्षेचा पेपर महाराष्ट्रातूनच लीक झाल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. या धक्कादायक खुलाशामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक संशयित आता रडारवर आले आहेत.

तपासाची सूत्रे आता CBI कडे
प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराज्य धागेदोरे पाहता, केंद्र सरकारने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. सीबीआयने याप्रकरणी विशेष पथकाची (Special Team) स्थापना केली असून, हे पथक ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) आणि ‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप’ (SOG) कडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. महाराष्ट्रातील कनेक्शन समोर आल्यामुळे आता तपासाचा मोर्चा राज्याकडे वळवण्यात आला आहे.

फेरपरीक्षेचा मार्ग मोकळा; ३ मेची परीक्षा रद्द
पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास जपण्यासाठी NTA ने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षेच्या तारखा आणि हॉल तिकीट लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!