Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut: ‘भाजप म्हणजे स्लो पॉयझन, गुदमरणाऱ्यांनी परत या…’; बंडखोरांना संजय राऊतांची ‘मातोश्री’वरून खुली ऑफर

Sanjay Raut: ‘भाजप म्हणजे स्लो पॉयझन, गुदमरणाऱ्यांनी परत या…’; बंडखोरांना संजय राऊतांची ‘मातोश्री’वरून खुली ऑफर

Sanjay Raut: शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. या अंतर्गत वादाचा फायदा उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांना घरवापसीची खुली ऑफर दिली आहे. “ज्यांना सध्याच्या सत्तेत गुदमरल्यासारखे वाटत आहे, त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यावे, मातोश्रीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत,” असे वक्तव्य राऊत यांनी केले. मात्र, ही ऑफर देत असतानाच त्यांनी एक मोठी अटही घातली आहे. गद्दारी करणाऱ्या काही विशिष्ट बंडखोर नेत्यांना पक्षात घेण्यास कायमचा मज्जाव असेल, असे स्पष्ट करत त्यांनी काही चेहऱ्यांसाठी ठाकरेंच्या दारे कायमची बंद असल्याचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचा सत्तारांना पश्चाताप 

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या मुलाने भाजप उमेदवाराविरोधात अर्ज भरल्याने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ‘भाजप मित्रपक्षांना संपवत आहे’ या सत्तारांच्या आरोपावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “हे सत्तारांचे वैयक्तिक मत असले तरी, त्यांना आता उद्धव ठाकरेंची साथ सोडून जाण्याचा पश्चाताप होत असावा.” एवढेच नव्हे तर, शिंदे गटातील अनेक आमदार अंतर्गत बैठकांमध्ये भाजपचा उल्लेख ‘स्लो पॉयझन’ (हळूहळू संपवणारे विष) असा करत असल्याची खळबळजनक माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सत्तारांची मनधरणी सुरू, तर राऊतांमुळे राजकीय तापमान वाढले

सत्तारांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महायुतीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली असून, प्रमुख नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एकीकडे सत्तारांची मनधरणी करण्यासाठी तातडीने बैठकांचे सत्र सुरू असताना, दुसरीकडे संजय राऊत यांनी ‘स्लो पॉयझन’ आणि ‘घरवापसी’चा मुद्दा उपस्थित करून महायुतीची कोंडी केली आहे. राऊत यांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा कलगीतुरा रंगला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!