Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 8 जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी

नवी दिल्ली: आयपीएल २०२५ चॅम्पियन आरसीबीच्या स्वागतासाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी जमली होती. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी गेट उघडताच चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आठ चाहत्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी, अनेक लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. स्टेडियमबाहेर इतकी गर्दी होती की, चाहते भिंतीवरून उडी मारून आत जात होते. काहीजण तर झाडांवर चढून स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, ही चेंगराचेंगरी स्टेडियमच्या गेट क्रमांक १ जवळ झाली आहे. स्टेडियममध्ये पोहोचण्यापूर्वी आरसीबीचे खेळाडू विधानसभेत पोहोचले होते. जिथे मुख्यमंत्र्यांनी सर्व खेळाडूंचा सन्मान केला. यानंतर, खेळाडूंची टीम बस चिन्नास्वामी स्टेडियमकडे रवाना झाली. आरसीबीची ही विजयी परेड लक्षात घेऊन बेंगळुरूमध्ये वाहतूक पोलिसांनी नागरिकांना त्याबाबत सूचना देखील केल्या होत्या.

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
यापूर्वी, बेंगळुरू वाहतूक पोलिसांनी X वर जारी केलेल्या निवेदनानुसार, वाहतूक समस्येमुळे विधान सौधा ते स्टेडियमपर्यंतची बहुप्रतिक्षित ओपन-रूफ बस परेड होऊ शकत नाही. त्यानंतर आरसीबीने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, ‘आम्ही सर्व चाहत्यांना पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करतो, जेणेकरून सर्वांना शांततेत आनंद घेता येईल.’

तथापि, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरचे दृश्य वेगळे होते. मोठ्या पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत, चाहते आत जाण्यासाठी धडपडत होते. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विधान सौधाबाहेर हजारो चाहते वाट पाहत असल्याचेही दिसून आले. शहरातील पावसाळी वातावरणामुळे अधिकाऱ्यांना असा निर्णय घ्यावा लागला. यासोबतच, आरसीबीच्या विजयानंतर मंगळवारी रात्री गर्दी नियंत्रित करण्यात पोलिसांना खूप अडचणींचा सामना करावा लागला.

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जविरुद्ध आरसीबीने विजय मिळवल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून चाहते रस्त्यावर उतरले. बेंगळुरूमध्ये रात्रभर फटाके वाजवून चाहत्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. यानंतर, पुन्हा एकदा सकाळी चाहत्यांची गर्दी रस्त्यावर येऊ लागली. आरसीबी संघाचा विजयोत्सव दुपारी ३ वाजता सुरू होणार होता, परंतु गर्दी इतकी वाढली होती की, त्याची वेळ बदलावी लागली. जास्त गर्दीमुळे प्रशासनालाही त्यावर नियंत्रण ठेवण्यात खूप अडचणी आल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!