Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत मोठी अपडेट! आरोपी फारुख बागवानला 12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामीन मंजूर

पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत मोठी अपडेट! आरोपी फारुख बागवानला 12 वर्षांच्या तुरुंगवासानंतर जामीन मंजूर

Pune Serial Blasts Case: मुंबई उच्च न्यायालयाने 2012 पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख शौकत बागवान याला दीर्घ प्री-ट्रायल कोठडी आणि खटल्याला झालेल्या विलंबामुळे जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कलम 21 नुसार जलद खटल्याचा अधिकार हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असल्याचे अधोरेखित केले. 39 वर्षीय बागवान 26 डिसेंबर 2012 पासून कोठडीत असून, त्याने 12 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये विशेष मकोका न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.

दरम्यान, 1 ऑगस्ट 2012 रोजी पुण्यात पाच कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले होते, ज्यात एक व्यक्ती जखमी झाली होती. सहावा बॉम्ब निकामी करण्यात आला होता. या स्फोटांचा कट इंडियन मुजाहिदीन (IM) ने रचल्याचा आरोप आहे. बचाव पक्षाने असा दावा केला की बागवानच्या दीर्घकाळाच्या नजरकैदेमुळे त्याचे संवैधानिक अधिकार बाधित झाले आहेत. विशेषतः सह-आरोपी मुनीब मेमनला सप्टेंबर 2024 मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तसेच 170 पैकी केवळ 27 साक्षीदारांचीच आतापर्यंत चौकशी झाल्याचे न्यायालयाने नोंदवले.

अभियोजन पक्षाने मात्र बागवानच्या कबुलीजबाबावर भर दिला होता, ज्यात त्याने सिम कार्डसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचे नमूद आहे. तथापि, खूनासारखे गंभीर आरोप नसल्यामुळे आणि खटल्यातील विलंब लक्षात घेऊन न्यायालयाने 1 लाख रुपयांचा जामीनपत्र सादर करण्याच्या अटीवर बागवानला जामीन मंजूर केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!