Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड! अग्निशमन दलाने 17 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

वडाळ्यात मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड! अग्निशमन दलाने 17 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं

मुंबई: सोमवारी सकाळी वडाळा परिसरात मुंबई मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळ आणि घबराट पसरली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ट्रेन अचानक थांबली. सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई करत 17 प्रवाशांना सुरक्षितरीत्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये हलविण्यात आले. या प्रक्रियेत अग्निशमन दलानेही मदत केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

एमएमआरडीएच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली की सकाळी 7:45 वाजता स्थलांतर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. थांबलेली मोनोरेल कपलिंगद्वारे हटवली जाईल आणि तांत्रिक तज्ज्ञ बिघाडामागील कारणांचा तपास करतील.

दरम्यान, मुंबई मोनोरेलमध्ये गेल्या महिन्याभरात हा तिसरा मोठा बिघाड आहे. यापूर्वीही दोन वेळा अचानक सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना प्रवासात अडथळा आला होता. या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या महिन्यातही आचार्य अत्रे चौक स्टेशनवर एक मोनोरेल 12 मिनिटांसाठी थांबली होती. मात्र ती घटना तांत्रिक बिघाडामुळे नव्हे तर प्रवाशांना उतरवण्यासाठी होती, असे एमएमएमओसीएलने स्पष्ट केले होते.

मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली कार्यरत मोनोरेल असून गर्दीच्या शहरात जलद आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा एक आधुनिक पर्याय म्हणून ती वापरली जाते. परंतु, सततच्या तांत्रिक अडचणींमुळे तिचं नियोजन आणि देखभाल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!