Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या कुटुंबाचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; ३३ एकर जमीनीवर मंत्र्याचा कब्जा

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या कुटुंबाचा भाजप नेत्यावर गंभीर आरोप; ३३ एकर जमीनीवर मंत्र्याचा कब्जा

धुळे : महाराष्ट्राच्या राजकारणात जमिनीच्या वादाने नवे वळण मिळाले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह राणे पाटील यांच्या कुटुंबाने भाजप नेते व महाराष्ट्र सरकारमधील पाणीपुरवठा आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार गोरेराव रावल यांच्यावर बेकायदेशीर जमीनकब्ज्याचा गंभीर आरोप केला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दोंडाईचा येथील ३३ एकर शेती जमिनीवर रावल आणि त्यांच्या समर्थकांनी कब्जा केल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

ही जमीन प्रतिभा पाटील आणि त्यांच्या भावांची संयुक्त मालमत्ता असल्याचे सांगितले जात आहे. न्यायालयाने पाटील कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला असूनही, रावल कुटुंबाने जमीन सोडली नाही. गुरुवारी (२५ सप्टेंबर) जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस आणि रावल समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोपही आहे.

शनिवारी (२७ सप्टेंबर) जळगाव येथे पत्रकार परिषदेत प्रतिभा पाटील यांचे भाचे उदयसिंह पाटील (किशोरसिंग दिलीपसिंग पाटील) यांनी रावल यांच्यावर थेट हल्ला चढवला. “दोंडाईचा येथील ही जमीन आमचे आजोबा नारायणसिंग पाटील यांच्या नावावर होती. वारसदार म्हणून सातबारा कोरंट्यात प्रतिभाताई, त्यांचे भाऊ दिलीपसिंग, रणजितसिंग, गजेंद्रसिंग, बिलामसिंग आणि बहीण अरुणा गुणवंतसिंग पाटील यांची नावे आहेत. मात्र, रावल कुटुंबातील बितेहसिंग रावल यांच्यासह पाच जणांनी ही जमीन हडपली,” असा आरोप उदयसिंह यांनी केला.

न्यायालयाने पाटील कुटुंबाच्या बाजूने निकाल देत रावल यांचा दावा फेटाळला असला तरी, ते राजकीय प्रभाव आणि गुंडागर्दीने जमीन सोडण्यास नकार देत आहेत. “कोर्टाच्या आदेशानुसार बेलीफसह सनदशीर मार्गाने गुरुवारी वारसांसह ताबा घेण्यास गेलो, पण रावल समर्थकांनी दमदाटी करून हल्ला केला.

पोलिसांनीही सहकार्य केले नाही,” असे उदयसिंह यांनी सांगितले. त्यांनी गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली. “रावल हे शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार आणि धुळेचे पालकमंत्री आहेत, तरीही ते मंत्रीपदाचा गैरवापर करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!