Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Farmer Income Tax: काय सांगता! नाशिकच्या शेतकऱ्यांनी भरला तब्बल 218 कोटींचा कर

Farmer Income Tax: काय सांगता! नाशिकच्या शेतकऱ्यांनी भरला तब्बल 218 कोटींचा कर

Farmer Income Tax: राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना, नाशिकच्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली आर्थिक ताकद दाखवून दिली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांत पावसाने हाहाकार माजवला असतानाही नाशिकच्या शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा कर भरणा करून शेतकरी कर भरत नाहीत या टीकेला ठोस प्रत्युत्तर दिलं आहे.

नाशिकमधील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या सह्याद्री फार्म्स या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 1,955 कोटी रुपयांची उलाढाल केली. या कंपनीने 85.5 कोटी रुपयांचा कर भरला असून, त्यापैकी 54 कोटी रुपयांचा आयकर सरकारी तिजोरीत जमा करण्यात आला आहे. इतकंच नाही तर कंपनीने 99.7 कोटी रुपयांचा नफा मिळवून राज्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक शिस्तीचं आणि प्रगतीचं मोठं उदाहरण ठेवले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! पूरग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर; शेतकऱ्यांना काय-काय मिळणार?

शेतकऱ्यांचा एकूण करभरणा

आतापर्यंत शेतकऱ्यांनी विविध करांद्वारे 218.4 कोटी रुपये सरकारकडे भरले आहेत. खत, औषधे, शेतीतील उपकरणे यांवरील GST देखील शेतकरी प्रामाणिकपणे भरत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी एकरी सरासरी 36 हजार रुपयांचा कर भरतात. राज्यभरातील द्राक्ष उत्पादकांकडून 1,300 ते 1,400 कोटी रुपयांपर्यंतचा कर सरकारी तिजोरीत जमा होत असल्याचा अंदाज आहे.

अतिवृष्टीचा तडाखा आणि सरकारी मदतीची अपेक्षा

दुसरीकडे, राज्यात सततच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचं उत्पादन जवळपास 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कृषि तज्ज्ञांच्या मते, सरकारने शेतीला ‘कृषि उद्योग’ म्हणून वागणूक देत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आजच्या आर्थिक आव्हानांमध्येही नाशिकचा शेतकरी कर भरण्याइतका सक्षम आहे, हे राज्याच्या कृषि अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देणारे उदाहरण ठरले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!