Today शुक्रवार, 7th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात म्यानमारच्या दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव आणि जऊळका दरम्यान, कॉरिडॉर क्रमांक 232 वर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून नागपूरकडे जात असलेली इनोव्हा कार नियंत्रण सुटल्यामुळे अपघातग्रस्त झाली.

सदर इनोव्हा कार जगन्नाथपुरीकडे निघाली होती. मात्र, प्रवासादरम्यान चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि कार महामार्गावरील लोखंडी रेलिंग तोडून खाली जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला आणि म्यानमारमधील दोन्ही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Nandurbar Accident : धनतेरसला सातपुड्यात भीषण अपघात, भाविकांच्या पिकअपवर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेल्याने बचावकार्याला अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याची शक्यता वर्तवली आहे.

समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची मालिका वाढत चालली आहे. काही महिन्यांपूर्वी याच मार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांचे प्राण गेले होते. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!