Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! एकाच झाडाला गळफास घेत प्रेमीयुगुलांनी उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! एकाच झाडाला गळफास घेत प्रेमीयुगुलांनी उचललं टोकाचं पाऊल

Kolhapur Crime: कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका २८ वर्षीय तरुणाने आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने जंगलात एकाच दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रेमप्रकरणातून निर्माण झालेल्या नैराश्यातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जंगलात आढळले मृतदेह

राधानगरी तालुक्यातील तरसंबळे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यापासून अर्धा किलोमीटर आत असलेल्या घनदाट जंगलात ही घटना घडली. शेळेवाडी येथील ओंकार ऊर्फ उदय कृष्णात बरगे (वय २८) आणि एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी हे दोघेही एकाच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. एका शेतकऱ्याने हा प्रकार पाहिल्यानंतर पोलीस पाटील गुरुनाथ कांबळे यांनी राधानगरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आत्महत्या साधारण चार दिवसांपूर्वी घडली असावी. मृतदेहांची अवस्था पाहता परिसरात दुर्गंधी पसरली होती, त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी रात्री उशिरा दोन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा – Kolhapur Crime: ‘तुला मुलं होत नाही…’; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन

आत्महत्या केलेला ओंकार बरगे हा गावात अत्यंत मनमिळाऊ आणि कष्टाळू तरुण म्हणून ओळखला जात होता. बिद्री साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा स्वतःचा ट्रॅक्टर तो चालवत असे. इतकेच नव्हे तर, गावातील यात्रेत १०० किलोची गुंडी लीलया उचलणारा शरीरसौष्ठवप्रेमी तरुण म्हणून त्याची ख्याती होती. अशा धडधाकट आणि मेहनती तरुणाने इतके टोकाचे पाऊल उचलल्याने शेळेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!