Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची तयारी; विविध विभाग, राज्ये आदींकडून सूचना मागवल्या, संसदेत माहिती

सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची तयारी; विविध विभाग, राज्ये आदींकडून सूचना मागवल्या, संसदेत माहिती

नवी दिल्ली: आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत सरकारने संरक्षण आणि गृह मंत्रालये, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग तसेच राज्यांसह सर्व संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत, अशी माहिती संसदेत देण्यात आली. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू केला जाणे अपेक्षित आहे. जानेवारीमध्ये कें द्रीय मंत्रिमंडळाने सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सुमारे ६५ लाख पेन्शनधारकांचे भत्ते यांच्यात सुधारणा करण्यासाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मान्यता दिली होती. सहा महिन्यांनंतरही आयोगाची स्थापना का झाली नाही, या प्रश्नावर मंत्री पंकज चौधरी म्हणाले की, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि राज्यांसह अन्य संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सरकारकडून आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची अधिसूचना जारी झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी सुधारित वेतनश्रेणी कधी लागू केली जाईल, असे विचारले असता चौधरी म्हणाले की, आठव्या वेतन आयोगाने शिफारसी केल्यानंतर आणि त्या सरकारने स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी सुरू केली जाईल.

साधारणपणे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार दर १० वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना करते. सातवा वेतन आयोग फेब्रुवारी २०१४ मध्ये स्थापन करण्यात आला होता. त्याच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात आल्या. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे.

महागाईमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या वास्तविक मूल्यात झालेल्या घसरणीची भरपाई करण्यासाठी, त्यांना महागाई भत्ता (डीए) दिला जातो आणि महागाईच्या दराच्या आधारावर दर सहा महिन्यांनी डीएचा दर वेळोवेळी सुधारित केला जातो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!