Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis: ‘आमच्यात लपून-छपून भेटण्यासारखं….’; उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन

Devendra Fadnavis: ‘आमच्यात लपून-छपून भेटण्यासारखं….’; उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांनी सोडलं मौन

Devendra Fadnavis: गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ‘मध्यरात्रीची भेट’ ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. “आम्हाला भेटायचे असेल तर आम्ही लपून कशाला भेटू?” असा रोखठोक सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच, खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

काय होता तो सोशल मीडियावरील दावा?
प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित ‘प्रबुद्ध भारत’ या माध्यमाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या वादाला तोंड फुटले होते. २३ एप्रिल रोजी पहाटे २ च्या सुमारास उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले आणि उभय नेत्यांमध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या दाव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

“खुलेआम भेटू, चोरून कशाला?” – फडणवीसांचा पलटवार
या अफवांवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आणि अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझ्यात कोणतीही गुप्त भेट झालेली नाही. आमचे कोणतेही विषय लपवण्यासारखे नाहीत.” जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सना कायदेशीर नोटीस पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दोन्ही बाजूंकडून नकार
केवळ भाजपच नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही अशा कोणत्याही भेटीचा इन्कार केला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे वृत्त पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे सांगत जनतेला अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!