Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Budget 2026: अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी पाहिलेलं ‘ते’ स्वप्न पूर्ण होणार! अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

Budget 2026: अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी पाहिलेलं ‘ते’ स्वप्न पूर्ण होणार! अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

Budget 2026: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेसाठी जे स्वप्न पाहिले होते, त्याला आता केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून मोठे बळ मिळाले आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणण्याचा पुढाकार सर्वप्रथम अजितदादांनी घेतला होता, आता त्याच पावलावर पाऊल टाकत केंद्राने डिजिटल शेतीसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. ‘अखेर अजित पवारांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे,’ अशा शब्दांत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या ‘एआय’ मॉडेलची देशपातळीवर दखल
राज्याच्या मागील अर्थसंकल्पात अजित पवारांनी कृषी क्षेत्रातील एआय वापरासाठी ५५० कोटी रुपयांची तरतूद केली होती. या धाडसी निर्णयामुळे महाराष्ट्र हे देशातील ‘एआय धोरण’ राबवणारे पहिले राज्य ठरले. याच धर्तीवर केंद्र सरकारनेही आता कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवले असून, महाराष्ट्राच्या ‘महा-विस्तार’ अॅपच्या धर्तीवर आता ‘भारत विस्तार’ हे बहुभाषिक एआय साधन देशभर कार्यान्वित होणार आहे.

हेही वाचा – Plane Crash Controversy : ‘अजित पवारांचा अपघात की घातपात?’; भाजपच्या भ्रष्टाचार फाईलवरून संजय राऊतांचा खळबळजनक दावा

शेती आणि ग्रामीण विकासासाठी तिजोरी खुली
यावेळच्या अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सरकारने मोठी आर्थिक रसद पुरवली आहे:

  • अॅग्री बिझनेस नेटवर्क: १६७ कोटी रुपये.
  • सौर ऊर्जिकरण (उपसा सिंचन): २०७ कोटी रुपये.
  • ग्रामीण परिवर्तन योजना (SMART): ६४६ कोटी रुपये.
  • एकूण कृषी बजेट: सुमारे १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे संकेत.

शेतकऱ्यांच्या हाती ‘डिजिटल’ शस्त्र
‘भारत विस्तार’ या नव्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना हवामान, पीक नियोजन आणि बाजारभावाची माहिती त्यांच्या स्थानिक भाषेत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक थांबून निर्णय प्रक्रिया अधिक अचूक होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. शेतकऱ्याला तंत्रज्ञानाशी जोडणे हा अजितदादांचा ध्यास होता. केंद्र सरकारनेही आता याच मार्गाचा अवलंब केल्याने महाराष्ट्रातील शेती अधिक नफ्याची आणि सक्षम होईल, असं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या योजनांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!