Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती; म्हणाले, ‘दमदाटी करणाऱ्यांना….’

सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती; म्हणाले, ‘दमदाटी करणाऱ्यांना….’

सोलापूर: सोलापूरमध्ये एका विवादित कार्यक्रमात भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावल्याने राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. ॉया कार्यक्रमाचे आयोजन तडीपार गुंड श्रीशैल हुळ्ळे यांनी केले होते, ज्यामध्ये देशमुख व्यासपीठावरून भाजप शहराध्यक्षावर टीका करताना दिसले. देशमुख यांनी शहराध्यक्षाचे वर्तन चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आणि सांगितले की, जर कोणी बाहेरील पक्षातून येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करत असेल, तर त्याच्या कमरेत लाथ घालावी. त्यांनी आपल्या विधानात दमदाटी करणाऱ्यांना कठोर प्रतिसाद देण्याचा सल्ला दिला.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजासाठी आयोजित बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटलं की, ‘समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. मी स्वतः वीरशैव लिंगायत आहे आणि समाजाला एकत्र करण्यासाठी मी एक काय दहा बैठक घेईल. यावेळी त्यांनी भाजप शहराध्यक्षांच्या निर्णयावरही टीका केली की, ‘भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठक न घेण्यास सांगणे चुकीचे आहे.’

हेही वाचा – Maharashtra politics : महायुतीत खदखद..! शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर नाराज; शिंदेंकडे तक्रारीचा पाऊस

दरम्यान, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, तडीपार गुंड श्रीशैल हुळ्ळे विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे, एका तडीपार गुंडासोबत व्यासपीठावर बसून आणि स्वत:च्या पक्षावर टीका करणाऱ्या आमदार विजयकुमार देशमुखच्या विधानाने सोलापूरमध्ये जोरदार चर्चा सुरु केली आहे. तथापी, आता भाजप नेतृत्वाकडून या घटनेवर कोणती कारवाई केली जाईल, किंवा आमदार विजयकुमार देशमुखच्या या वादग्रस्त विधानावर पक्षाकडून प्रतिक्रिया येईल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!