Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Hamza Burhan Death: मोठी बातमी! दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का; पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान ठार

Hamza Burhan Death: मोठी बातमी! दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का; पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहान ठार

Hamza Burhan Death: हमजा बुरहान याच्या मृत्यूमुळे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी जाळ्याला मोठा धक्का बसला आहे. बंदी घातलेल्या Al-Badr या संघटनेचा प्रमुख कमांडर असलेला अर्जमंद गुलजार उर्फ ‘बुरहान हमजा’ याचा पाकिस्तान-अधिकृत काश्मीर (PoK) मध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचा आरोप असलेला हा दहशतवादी दीर्घकाळ भारतविरोधी कारवायांमध्ये सक्रिय होता.

पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन उभारले होते दहशतवादी जाळे

अर्जमंद गुलजार हा मूळचा जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा भागातील रहिवासी होता. सुमारे सात वर्षांपूर्वी तो वैध प्रवास कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानात गेला होता, जिथे त्याने Al-Badr या संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर तो या संघटनेचा ‘ऑपरेशनल कमांडर’ बनला आणि पाकिस्तानमधूनच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करत होता. दहशतवादी भरती, आर्थिक रसद आणि शस्त्रास्त्र पुरवठा यामध्ये त्याची प्रमुख भूमिका असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी त्याला अनेक वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड यादीत ठेवले होते. २०२२ मध्ये गृह मंत्रालयाने त्याला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणे, तरुणांची भरती करणे आणि दहशतवादी नेटवर्क मजबूत करणे यामध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचे आरोप आहेत.

पुलवामा ते शोपियांपर्यंत सक्रिय नेटवर्क

पुलवामा परिसर हा काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांचा संवेदनशील भाग मानला जातो. येथेच पूर्वी बुरहान वानीसारखे दहशतवादी उदयास आले होते. अर्जमंद गुलजारचे नेटवर्कही याच पद्धतीने कार्यरत असल्याचे मानले जाते, जिथे सोशल मीडिया आणि स्थानिक संपर्कांचा वापर करून तरुणांचे ‘रॅडिकलायझेशन’ केले जात होते.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, त्याचे जाळे पुलवामा, शोपिया आणि अवंतीपोरा परिसरात सक्रिय होते. पाकिस्तानातून निर्देश देत स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्सच्या माध्यमातून शस्त्रे, निधी आणि हल्ल्यांचे नियोजन केले जात असल्याचा आरोप त्याच्यावर होता. स्फोटक साठा, ग्रेनेड हल्ले आणि भरती मोहिमा यांसारख्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचे नाव जोडले गेले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!