Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कल्याण-अहिल्यानगर मार्गावर इको कारची सिमेंट मिक्सरला धडक; 11 प्रवाशांचा मृत्यू

Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कल्याण-अहिल्यानगर मार्गावर इको कारची सिमेंट मिक्सरला धडक; 11 प्रवाशांचा मृत्यू

Kalyan-Ahilyanagar Highway Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील पांजार पुलावर सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका भरधाव सिमेंट मिक्सरने प्रवाशांनी भरलेल्या इको टॅक्सीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, महामार्गावर सर्वत्र रक्ताचा सडा पडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

अपघाताचा थरार
मुरबाडमधील काही रहिवासी इको टॅक्सीने कल्याणच्या दिशेने प्रवास करत असताना सकाळी ११:१५ च्या सुमारास हा काळ बनून आलेला अपघात झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून आता केवळ गाडीचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. या भयावह अपघातात एक धक्कादायक पण दिलासादायक बाब म्हणजे, कारमधील एक आजी आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावल्या आहेत. मात्र, गाडीत असलेल्या एकूण १२ प्रवाशांपैकी ११ जणांनी आपले प्राण गमावल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर एक जण गंभीर जखमी असून त्याची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.

स्थानिकांचे मदतकार्य आणि पोलीस तपास
अपघाताचा भीषण आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तत्परतेने मदतीसाठी धाव घेतली. चक्काचूर झालेल्या कारच्या पत्र्यात अडकलेले मृतदेह बाहेर काढताना उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ पंचनामा सुरू केला असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. सिमेंट मिक्सरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला की वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे हा अपघात घडला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मुरबाड आणि कल्याण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून, महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत संताप व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!