Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ind vs NZ ODI Series Gautam Gambhir: भारताचा परभाव, मैदानात गौतम गंभीर हाय-हायच्या घोषणा; सर्व खेळाडू चक्रावले, विराट कोहली तर… VIDEO

Ind vs NZ ODI Series Gautam Gambhir: भारताचा परभाव, मैदानात गौतम गंभीर हाय-हायच्या घोषणा; सर्व खेळाडू चक्रावले, विराट कोहली तर… VIDEO

Ind vs NZ ODI Series Gautam Gambhir: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-1 ने पराभव केला. 38 वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात येऊन टीम इंडियाचा एकदिवसीय सामन्यात पराभव केला. दरम्यान, तिसऱ्या एकदिवसीय सामना संपल्यानंतरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सामना पाहण्यासाठी मैदानात आलेले प्रेक्षक गौतम गंभीर हाय-हाय..अशा घोषणा देत आहेत.

विराट कोहलीने काय केले?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना संपल्यानंतर बक्षीस समारंभ सुरु होते. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियामधील अन्य खेळाडूही मैदानात उपस्थित होते. यादरम्यान, स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडून गौतम गंभीरच्या विरोधात घोषणा देण्यात येत होत्या. गौतम गंभीर हाय-हाय..अशी घोषणा काही प्रेक्षकांकडून दिल्या असल्याचे व्हिडीओमधून दिसत आहे. सदर प्रकार बघून विराट कोहलीनेही डोक्याला हात लावल्याचे दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumit Kumar (@dailycricket007_)

न्यूझीलंडने भारतात पहिल्यांदाच एकदिवसीय मालिका जिंकली-
भारतीय भूमीवर न्यूझीलंडने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. मालिकेच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 4 विकेट्सने आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली. मालिकेत विराटच्या फलंदाजीने शानदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये तीन डावांमध्ये 240 धावा केल्या. यामध्ये त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!