Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMPML Bus Fire : चाकणमध्ये PMPML बसला भीषण आग; थोडक्यात बचावले 50 प्रवाशांचे प्राण

PMPML Bus Fire : चाकणमध्ये PMPML बसला भीषण आग; थोडक्यात बचावले 50 प्रवाशांचे प्राण

PMPML Bus Fire : पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा समजल्या जाणाऱ्या PMPML बसच्या सुरक्षिततेवर आज पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोर आज सकाळी एका धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागली. या बसमध्ये ५० कामगार प्रवास करत असताना अचानक आग लागल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
ही घटना घडली तेव्हा बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती. बसच्या पुढच्या भागातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच, चालकाने क्षणाचाही विलंब न लावता बस रस्त्याच्या कडेला उभी केली. चालकाच्या या समयसूचकतेमुळे बसमधील ५० कामगारांना तातडीने सुरक्षितरित्या खाली उतरवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण बस कचाट्यात घेतली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

PMPML च्या इलेक्ट्रिक बस: ‘ग्रीन मोबिलिटी’ की फिरता मृत्यू?
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सध्या इलेक्ट्रिक बसेसचा (e-Bus) मोठ्या प्रमाणावर आग्रह धरला जात आहे. मात्र, या बसेस आता ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहेत का, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत. गेल्या केवळ एका वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये PMPML बसेसना आग लागण्याच्या तब्बल १० ते १२ घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद आहे. इंजिन गरम होणे किंवा बॅटरीतील बिघाड अशी तांत्रिक कारणे पुढे करून प्रशासन दरवेळी आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र दिसत आहे.

तांत्रिक तपासणीचा मोठा अभाव
एका इलेक्ट्रिक बसची किंमत कोट्यवधींच्या घरात असतानाही, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीत (Maintenance) मोठी कपात केली जाते का? असा संशय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या अनेक उपाययोजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. नियमानुसार प्रत्येक फेरीनंतर इलेक्ट्रिकल वायरिंगची तांत्रिक तपासणी होणे अनिवार्य आहे, जे होताना दिसत नाही. तथापी, धूर निघताच चालक आणि प्रवाशांना सतर्क करणारी आधुनिक अलार्म यंत्रणा बसमध्ये असणे आवश्यक आहे. आग लागल्यास अग्निशमन उपकरणे कशी वापरावीत, याचे योग्य प्रशिक्षण अनेक कंत्राटी चालकांकडे नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

प्रवाशांच्या जिवाशी खेळ कधी थांबणार?
आजची ही घटना केवळ एक अपघात नसून ती प्रशासकीय दुर्लक्षाचा जळजळीत पुरावा आहे. जर या ५० कामगारांपैकी कोणाचाही जीव गेला असता, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते? PMPML प्रशासनाने आता केवळ कंत्राटदारांवर दंड ठोकून शांत न बसता, त्यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करण्याची वेळ आली आहे. प्रवाशांचा प्रवास ‘सुखकर’ होण्याऐवजी तो ‘जीवघेणा’ ठरू नये, हीच माफक अपेक्षा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!