Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis: ‘माझी 4 भाषणं दाखवा आणि ठाकरेंकडून 1 लाख आणा…’; उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचे सडेतोड उत्तर

Devendra Fadnavis: ‘माझी 4 भाषणं दाखवा आणि ठाकरेंकडून 1 लाख आणा…’; उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला फडणवीसांचे सडेतोड उत्तर

Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील ‘चॅलेंज वॉर’ने जोर धरला आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून केलेल्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले असून, आता थेट १ लाख रुपयांची पैज लावली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत फडणवीस यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

काय होते ठाकरेंचे आव्हान?

काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना डिवचले होते. पंतप्रधान मोदींपासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत कुणीही हिंदू-मुस्लिम उल्लेख न करता विकासावर भाषण करून दाखवावे, असे भाषण दाखवणाऱ्यास मी १ लाख रुपये देईन, असे आव्हान ठाकरेंनी दिले होते.

फडणवीसांचा पलटवार

ठाकरेंच्या या आव्हानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, मुंबई वगळता इतर कोणत्याही महापालिकेच्या निवडणुकीतील माझी भाषणे काढून पहा. मी ९० टक्के विकासावर आणि फक्त १० टक्के विरोधकांना उत्तरे देण्यासाठी बोलतो. माझी कोणतीही चार भाषणे ठाकरेंना नेऊन द्या आणि त्यांच्याकडून माझे १ लाख रुपये घेऊन या. इतकेच नाही तर, फडणवीसांनी ठाकरेंना ‘७ हजार रुपयांचे प्रतिआव्हान’ दिले आहे. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर केलेले एक तरी भाषण दाखवावे, मी त्यांना ७ हजार रुपये देईन, असा टोलाही त्यांनी लगावला.

कोस्टल रोडच्या कामावरून सुरू असलेल्या श्रेयवादावर फडणवीसांनी सविस्तर भाष्य केले. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दाव्यांमधील हवा काढून घेताना काही महत्त्वाचे खुलासे केले. कोस्टल रोडची संकल्पना जुनी असली तरी, केंद्रातील पर्यावरण विभागाच्या परवानग्या मिळवणे सर्वात कठीण होते. मी मुख्यमंत्री असताना सतत पाठपुरावा करून या परवानग्या मिळवल्या. केंद्राने २५० एकर जमिनीवर बांधकाम करण्याची अट घातली होती, परंतु मी प्रतिज्ञापत्र देऊन तिथे फक्त मैदाने आणि मोकळी जागा असेल, असे स्पष्ट केले. मी सर्व परवानग्या आणल्या, पण एक दिवस मला न कळवता उद्धव ठाकरेंनी कोस्टल रोडचे भूमीपूजन उरकून घेतले. महापालिका आयुक्तांनी मला विचारले असता, मी श्रेयवादात न पडता त्यांना उद्घाटन मीच करेन असे सांगितले होते, असा गौप्यस्फोट फडणवीसांनी केला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!