Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gautami Patil: ‘पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून…’; खरात प्रकरणावर गौतमी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया

Gautami Patil: ‘पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून…’; खरात प्रकरणावर गौतमी पाटीलची संतप्त प्रतिक्रिया

Gautami Patil: नाशिकचा स्वयंघोषित बाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचा पाढा आता अधिकच मोठा होत चालला आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली निष्पाप लोकांची फसवणूक केल्यानंतर, आता खरातच्या ६० कोटी रुपयांच्या प्रचंड आर्थिक महाघोटाळ्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या गंभीर प्रकरणामुळे अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या गुन्हेगारी साम्राज्याचा पर्दाफाश झाला असून, संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

“असे प्रकार पुन्हा घडता कामा नयेत” – गौतमी पाटील यांची आक्रमक भूमिका
अशोक खरात प्रकरणावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, “या भोंदूबाबावर प्रशासनाने अशी काही कठोर कारवाई करायला हवी, की ज्याची समाजात दहशत निर्माण होईल. आपल्या देशात आणि समाजात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कायद्याचा बडगा कडक असणे आवश्यक आहे.” गौतमीच्या या विधानाला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे.

पंचतारांकित हॉटेलमधून ‘हवाला’चे काळे साम्राज्य
तपासादरम्यान समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. खरात केवळ आश्रमापुरता मर्यादित नव्हता, तर मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून त्याने आपले अवैध साम्राज्य विस्तारले होते. त्याने या हॉटेलमध्ये प्रतिदिन २५ हजार रुपये भाडे असलेला एक आलिशान सूट कायमस्वरूपी बुक केला होता. वर्षाचे ३६५ दिवस खरातच्या नावावर असलेल्या याच खोलीतून कोट्यवधींच्या हवाला व्यवहारांची सूत्रे हलविली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

६० कोटींचा पतसंस्था घोटाळा आणि संशयास्पद खाती
अशोक खरातवर आता शिर्डी आणि राहाता भागात नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. समता पतसंस्थेच्या माध्यमातून त्याने मोठा आर्थिक डल्ला मारल्याचे समोर आले आहे. खरातने ५७ विविध व्यक्तींच्या नावे तब्बल १०० बँक खाती उघडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व १०० खात्यांवर ‘नॉमिनी’ (वारसदार) म्हणून स्वतः अशोक खरातचे नाव होते आणि त्याचाच मोबाईल नंबर या खात्यांशी जोडलेला होता. या खात्यांमध्ये ‘चाकणकर’ आडनाव असलेल्या व्यक्तींची काही खाती असल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, मात्र पोलीस या संदर्भात अधिकृत तपास करत आहेत.

ED तपास करणार; फडणवीसांचा कडक इशारा
या प्रकरणातील आर्थिक गुंतागुंत आणि व्यवहारांचा आवाका पाहता, आता अंमलबजावणी संचालनालय (ED) या प्रकरणाचा ताबा घेण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करताना स्पष्ट केले आहे की, हा गुन्हा अत्यंत गंभीर असून यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही. तपासाचे आदेश देण्यात आले असून खरातच्या आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!