Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident: सरकारी ड्युटीवर असताना काळाचा घाला; पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला निघालेल्या प्राध्यापकाचा भीषण अपघातात मृत्यू

Pune Accident: सरकारी ड्युटीवर असताना काळाचा घाला; पुण्यात उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला निघालेल्या प्राध्यापकाचा भीषण अपघातात मृत्यू

Pune Accident: शासकीय कर्तव्याचे पालन करत असताना एका तरुण प्राध्यापकावर काळाने झडप घातल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. निवडणूक विभागाच्या बीएलओ (BLO) पदाची जबाबदारी सांभाळणारे प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे (वय ४०) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला जात असताना हा अपघात घडला.

कर्तव्य बजावतानाच शेवटचा श्वास
प्राध्यापक ज्ञानेश्वर रोटे हे मूळचे अहिल्यानगरचे रहिवासी होते. पुण्यात प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करण्यासोबतच त्यांच्याकडे निवडणूक कामाचीही जबाबदारी होती. उपजिल्हाधिकाऱ्यांनी आज एक अत्यंत महत्त्वाची SIR बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी रोटे आपल्या दुचाकीवरून जात असताना वाटेतच त्यांच्या वाहनाला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की रोटे यांचा जागीच मृत्यू झाला.

शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
अवघ्या ४० व्या वर्षी ज्ञानेश्वर रोटे यांचे निधन झाल्याने शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अध्यापन आणि प्रशासकीय जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर ते सक्रियपणे कार्यरत होते. एका निष्ठावान शिक्षकाचा सरकारी कामावर जात असताना झालेला हा अंत सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारा ठरला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी सुरू आहे. एका महत्त्वाच्या बैठकीला येण्यापूर्वीच रोटे यांच्यावर काळाने झडप घातल्याने महसूल आणि निवडणूक विभागातही शोक व्यक्त केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!