इंदापूर : उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समिती यांचेकडून शेतकरी मच्छीमार बांधवांसाठी बुधवार (दि.11) रोजी कांदलगांव (ता. इंदापूर) याठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आली.
प्रमुख मागण्या आणि बैठकीचा उद्देश
या बैठकीमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा होऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे:
- शासन निर्णय रद्द करणे: १७ जून २०१९ आणि ८ ऑक्टोबर २०२५ चे शासन निर्णय तातडीने रद्द करावेत.
- जमिनीचा हक्क: धरणासाठी संपादित केलेली परंतु अद्याप वापरात नसलेली जमीन मूळ शेतकऱ्यांना परत द्यावी किंवा करारावर द्यावी.
- उपजीविकेचे संरक्षण: शेतकऱ्यांची संपादित जमीन त्यांच्याकडेच उपजीविकेसाठी कायम ठेवावी. ती खाजगी कंपन्यांना किंवा उद्योगपतींना देऊ नये.
- मच्छिमारांचे हित: उजनी धरणावर अवलंबून असलेल्या मच्छिमार बांधवांचा मासेमारीचा हक्क अबाधित राहावा.
दरम्यान, शेतकरी आणि मच्छिमारांच्या अस्तित्वाचा हा लढा आहे. प्रशासकीय अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व धरणग्रस्त आणि मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन उजनी धरणग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


