Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कर्जमाफी कधी करणार? अजित पवारांच्या सभेत गोंधळ! शेतकऱ्यांचा संताप उफाळला

कर्जमाफी कधी करणार? अजित पवारांच्या सभेत गोंधळ! शेतकऱ्यांचा संताप उफाळला

Nanded: नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात आणि पक्षप्रवेश सोहळ्यात अनपेक्षित गोंधळ उडाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देत संताप व्यक्त केला. अजित पवार यांच्या भाषणादरम्यान कर्जमाफी कधी करणार? अशा घोषणा सभास्थळी घुमू लागल्या. त्यामुळे अजित पवार यांना भाषण थांबवून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्पष्ट केले, ‘मी कर्जमाफी होणार नाही, असं कधीच म्हटलं नाही.’

दोन शेतकरी पोलिसांच्या ताब्यात

घोषणाबाजी सुरूच राहिल्याने पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली आणि सभा पुन्हा सुरू करण्यात आली. या कार्यक्रमात शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल दीड हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी अजित पवार उपस्थित होते आणि नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.

हेही वाचा – सोलापूरच्या राजकारणात खळबळ! चार माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश अडचणीत; कार्यकर्त्यांचा विरोध, अजित पवारांची नाराजी

पावसामुळे भाषण अर्धवट

दरम्यान, भाषण सुरू असतानाच अचानक पाऊस सुरू झाल्याने लोकांनी डोक्यावर खुर्च्या धरल्या आणि काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे अजित पवार यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. अजित पवार म्हणाले, ‘शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच त्यांनी सांगितले की तरुण शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

दत्ता भरणेंच्या सभेतही गोंधळ

दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यक्रमातही शेतकऱ्यांनी ‘संपूर्ण कर्जमाफी करा’ आणि ‘अतिवृष्टीचे अनुदान द्या’ अशा मागण्या करत गोंधळ घातला. पोलिसांनी हस्तक्षेप करत काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. सरकारने दिवाळीपूर्वी अतिवृष्टीचे अनुदान देऊ असे आश्वासन दिले असले, तरी त्याची पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!