Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

मोठी बातमी! मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई: उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. अमराठी भाषिकांविषयी भडकावू आणि चिथावणीखोर विधान केल्याचा आरोप करत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या याचिकेवर सोमवारी झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना धारेवर धरले. ‘उत्तर भारतीय’ आणि ‘अमराठी भाषिक’ असे शब्द याचिकेत का वापरले? असा थेट प्रश्न न्यायालयाने केला. न्यायालयाने स्पष्ट निर्देश देत सांगितले की हे शब्द वगळावेत, कारण संपूर्ण मुद्दा ‘द्वेषपूर्ण भाषण’ म्हणून मांडता येतो. यानंतर शुक्ला यांनी संबंधित शब्द काढून टाकण्याची तयारी दाखवली आणि न्यायालयाने याचिकेची नोंद घेतली. खंडपीठाने प्रकरणात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस जारी करत चार आठवड्यांत भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – 11 वर्षांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र; बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त राज ठाकरेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

याचिकेत काय आरोप करण्यात आले?

शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे की, राज ठाकरे यांनी अनेक वर्षांपासून मराठी भाषा आणि संस्कृतीच्या नावाखाली विशिष्ट भाषिक समाजावर लक्ष्य साधले आहे. त्यांच्या भावनांना चिथावणी देणाऱ्या भाषणांमुळे हिंदीभाषिक नागरिकांवर धमक्या आणि हिंसक प्रकार वाढले असल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेत मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. न्यायालयाने नोटीस दिल्यानंतर, आता सरकार आणि निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!