Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vinod Kulkarni: साताऱ्यात साहित्य संमेलनात खळबळ! कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Vinod Kulkarni: साताऱ्यात साहित्य संमेलनात खळबळ! कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Vinod Kulkarni: साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागणारी घटना घडली आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर संमेलन स्थळीच अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे शाहू स्टेडियम परिसरात एकच खळबळ उडाली असून, साहित्यप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी संमेलनाची शानदार सुरुवात झाली. मात्र, संमेलन स्थळावर कामाचे नियोजन सुरू असतानाच कुलकर्णी यांच्यावर हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही, परंतु या हल्ल्यामागचा सूत्रधार कोण आणि त्याचा हेतू काय होता, हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची’; साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश

दिमाखदार सुरुवात

या संमेलनाचे ध्वजारोहण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते संमेलनाचे प्रतीक हवेत सोडून या अक्षरसोहळ्याचा श्रीगणेशा करण्यात आला.

या साहित्य संमेलनात 150 पेक्षा अधिक पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. भव्य ग्रंथदिंडीमध्ये तब्बल 52 चित्ररथांचा सहभाग होता, ज्याने सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. कवी कट्टा, गझल कट्टा आणि प्रकाशन मंचाच्या माध्यमातून नवनवीन साहित्य प्रकारांना वाव दिला जात आहे. तथापी, संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल पर्यावरणपूरक थीमवर सुशोभित करण्यात आले आहे. या संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यिक आणि वाचक प्रेमी मोठ्या संख्येने साताऱ्यात दाखल झाले आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!