Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महायुतीतील नाराजी शिगेला? एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट

महायुतीतील नाराजी शिगेला? एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अंतर्गत धुसफूस आता महायुतीमध्ये उघडपणे दिसू लागली आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सर्वच मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने या वादाची ठिणगी चांगलीच भडकली. या राजकीय गदारोळानंतर दोनच दिवसांनी, एकनाथ शिंदे आज तात्काळ दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून, सूत्रांनुसार, या भेटीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील समन्वय आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याच्या उपायांवर सविस्तर चर्चा झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर, शिंदेंसह शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी त्यांच्यासमोर व्यक्त केली होती. या भेटीत नाराजी दूर करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जात असतानाच, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा – ‘एका हाताने टाळी वाजत नाही…’; मंत्रिमंडळ बैठकीवरील बहिष्कारानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया

शिंदे दिल्लीला जाताच फडणवीस-अजित पवारांची तातडीची बैठक

एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाल्याचे कळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये वाढलेली नाराजी आणि खुद्द मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, या पार्श्वभूमीवर महायुतीतील बिघडलेला समन्वय कसा सुधारायचा यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. नाराजी वाढत गेल्यास भविष्यातील राजकीय परिस्थिती कशी हाताळायची, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये गांभीर्याने विचारविनिमय झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या ‘ऑल इज वेल’ नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!