Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Punishment Ban for Teachers: विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर शिक्षकांवरच होणार गुन्हा; राज्य सरकारची नवी कठोर नियमावली जारी

Punishment Ban for Teachers: विद्यार्थ्यांना शिक्षा केली तर शिक्षकांवरच होणार गुन्हा; राज्य सरकारची नवी कठोर नियमावली जारी

Punishment Ban for Teachers: शाळेत शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक छळ सोसावा लागल्यास, आता थेट शिक्षकांवर आणि शाळा प्रशासनावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. वसई येथील एका विद्यार्थ्याचा शिक्षा भोगताना झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर, राज्य शालेय शिक्षण विभागाने अंत्यंत कठोर ‘बाल सुरक्षा नियमावली’ जाहीर केली आहे.

वसईतील त्या घटनेचा मोठा परिणाम

काही दिवसांपूर्वी वसईत शाळेत उशिरा आल्यामुळे एका सहावीच्या विद्यार्थ्याला १०० उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली होती, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारने त्या शाळेची नोंदणी रद्द केली असून, आता राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

हेही वाचा – Pimpri-Chinchwad : थंडी वाढली! पिंपरी-चिंचवडमधील मनपा शाळांच्या वेळेत बदल; कसं असेल नवीन वेळापत्रक?

या कृत्यांना आता ‘गुन्हा’ मानले जाईल

  • शारीरिक हिंसा: मारहाण करणे, कानशिलात लगावणे, कान किंवा केस ओढणे, चिमटे काढणे.
  • कठोर शिक्षा: उठाबशा काढायला लावणे, उन्हात किंवा पावसात उभे करणे, गुडघे टेकवून बसवणे.
  • मानसिक छळ: अपमानास्पद भाषेचा वापर, सर्वांसमोर खिल्ली उडवणे, धमकावणे किंवा भीती निर्माण करणे.
  • इतर बंधने: विद्यार्थ्यांचे अन्न किंवा पाणी जप्त करणे, सोशल मीडियावर त्यांचे फोटो-व्हिडिओ विनापरवाना पोस्ट करणे.

शाळा व्यवस्थापनावर ‘२४ तासांत’ कारवाईची टांगती तलवार

जर शाळेत कोणत्याही विद्यार्थ्याच्या सुरक्षेचा भंग झाला, तर संबंधित घटनेची माहिती मिळताच २४ तासांच्या आत पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करणे मुख्याध्यापकांना बंधनकारक आहे. सीसीटीव्ही फुटेज, हजेरी नोंद आणि लेखी तक्रारी जतन करण्याची जबाबदारी शाळा प्रमुखांची असेल. घटना लपवण्याचा किंवा पोलिसांना कळवण्यास उशीर केल्यास शाळा व्यवस्थापनावरच फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

हेही वाचा –Sudha Murty: सुधा मूर्तीं यांनी संसदेत केल्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाल्या, शाळांमध्ये ‘ही’ गोष्ट बंधनकारक करा

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन

ही नवीन नियमावली केंद्र सरकारच्या ‘शालेय सुरक्षा आणि संरक्षण मार्गदर्शक तत्त्वे (२०२१)’ वर आधारित आहे. ही नियमावली राज्यातील सर्व बोर्डांच्या (SSC, CBSE, ICSE, IB) शाळांना बंधनकारक असेल. तसेच, लैंगिक अत्याचारासारख्या (POCSO) गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आता शाळांमध्ये केवळ सुलभ पायाभूत सुविधा असून चालणार नाही, तर तक्रार निवारणासाठी पारदर्शक यंत्रणा असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्वस्वी जबाबदारी आता शिक्षक आणि व्यवस्थापनावर निश्चित करण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!