Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bharat Gogawale : मंत्री गोगावलेंचा मुलगा २४ दिवसांपासून फरार; हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Bharat Gogawale : मंत्री गोगावलेंचा मुलगा २४ दिवसांपासून फरार; हायकोर्टानेही अटकपूर्व जामीन फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

Bharat Gogawale Son Vikas Gogawale : रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) नेते आणि मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यापूर्वी माणगाव न्यायालयानेही दोनदा त्यांचा जामीन अर्ज नाकारला होता.

२ डिसेंबर २०२५ रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक २ मध्ये शिंदे गटाचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या राड्यात मारहाण, वाहनांची तोडफोड आणि पिस्तूल रोखण्याचे आरोप झाले. दोन्ही बाजूंनी परस्पर गुन्हे दाखल झाले असून, विकास गोगावले यांच्यासह २९ जणांवर गंभीर कलमांखाली (२१ कलमे) गुन्हा दाखल आहे.

घटनेच्या दिवसापासूनच विकास गोगावले फरार आहेत. गेल्या २४ दिवसांत पोलिसांना ते सापडलेले नाहीत. राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, जसे नाना जगताप, देखील फरार आहेत. या प्रकरणात पिस्तूल रोखण्याचा आरोपही समोर आला होता, ज्याबाबत दोन्ही गटांनी एकमेकांवर कुरघोडी केली.

या प्रकरणाचे मूळ रायगडातील राजकीय वैरात आहे. मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून तीव्र स्पर्धा आणि वाद सुरू आहेत. पालकमंत्रिपद, कार्यकर्ते फोडणे आणि स्थानिक वर्चस्वावरून दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. महायुती सरकार असूनही रायगडात शिंदे गट आणि अजित पवार गटातील हा संघर्ष उघड झाला आहे. महाड निवडणुकीत हा वाद मतदानादरम्यान उफाळून आला.

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, मंत्री पुत्र फरार असूनही पोलिस कारवाई करत नाहीत, याला फडणवीसांनी अभय दिले का?

पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जामीन फेटाळल्यानंतर विकास गोगावले यांची अटक टाळणे कठीण झाले आहे. या प्रकरणामुळे रायगडातील राजकीय वातावरण आणखी तणावपूर्ण झाले आहे. महापालिका निवडणुकांपूर्वी शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!