Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

तलाठ्यावर हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार

तलाठ्यावर हल्ला करणारा आरोपी अद्याप फरार

बोईसरः बोईसर पूर्व भागातील अनधिकृत दगड वाहतूक प्रकरणात तलाठी हितेश राऊत यांच्यावर हल्ला करणारा आरोपी धीरज सुधीर भंडारी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. घटनेला दहा दिवस उलटले तरीही आरोपीला पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि कारवाईच्या गतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

तलाठी राऊत यांनी शुक्रवारी मौजे गुंदले सजा भागात अनधिकृत दगड वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त केले. या कारवाईदरम्यान धीरज भंडारी याने तलाठ्याला धक्काबुक्की करत कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत ट्रक ताब्यात घेतले, मात्र हल्लेखोर आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पोलिसांनी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू ठेवला आहे.

मात्र दहा दिवस उलटूनही कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. स्थानिक नागरिकांकडून या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिस तपासाची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्थानिकांनी पोलिसांच्या या गतीने होणाऱ्या तपासावर ताशेरे ओढत हल्लेखोराला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. अनेकांनी पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असल्याचा आरोप केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!