Today बुधवार, 11th फेब्रुवारी 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लाडकी बहीण योजनेची योग्य अंमलबजावणी करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश; राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा

लाडकी बहीण योजनेची योग्य अंमलबजावणी करा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश; राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू राहणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था असताना उच्च न्यायालयाने राज्यभरातील महिलांना मोठा दिलासा दिला. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सुरळीत आणि योग्यरीत्या अंमलबजावणी करा, कुठलीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे आदेश राज्य सरकारला दिले.

बोरिवली येथील प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने अॅड. रुमाना बगदादी यांनी लाडकी बहीण योजनेला विरोध होत आहे. ४६ हजार कोटींच्या तरतुदीवर कॅगनेही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे ही योजना बंद केली जाणार का? दरमहा १५०० रुपयांच्या लाभापासून वंचित राहणार का? अशी शंका उपस्थित करत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश देण्याची विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने संबंधित विभागाच्या उपसचिवांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे सुरुवातीच्या अडचणी दूर करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली. विविध विभागांमधील ११ एजन्सींना महिलांचे अर्ज सादर करण्याकामी मदत करण्यासाठी नियुक्त केले होते. प्राप्त झालेल्या २.५१ कोटी अर्जांपैकी २.४३ कोटींपेक्षा जास्त अर्ज पात्र ठरवण्यात आले असून जवळपास ९० हजार अर्ज नाकारण्यात आल्याचे सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले.

याची दखल घेत खंडपीठाने योजनेच्या बदलत्या निकषांच्या पार्श्वभूमीवर योजनेतील पात्र महिलांना कुठल्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज असल्याचे खडेबोल राज्य सरकारला सुनावत योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीबाबत निर्देश दिले. ‘लाडकी बहीण’ योजनेचे ‘नारीशक्ती दूत’ अॅप काम करेनासे झाल्याने राज्यभरातील अनेक महिला योजनेच्या लांभापासून वंचित राहिल्या. त्यामुळे महिलांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारावेत, अशी मागणी प्रमेय वेल्फेअर फाऊंडेशनने केली होती. त्यावर महिला व बालविकास विभागाच्या उपसचिव आनंद भोंडवे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास असमर्थता दर्शवत ९० हजारांवर महिलांचे अर्ज फेटाळल्याची कबुली दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!