Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar: महाराष्ट्रातील ‘छुपा प्रयोग’ बंगालमध्ये अधिकृतपणे राबवला…; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

Rohit Pawar: महाराष्ट्रातील ‘छुपा प्रयोग’ बंगालमध्ये अधिकृतपणे राबवला…; रोहित पवारांचा भाजपवर निशाणा

Rohit Pawar: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाचे लक्ष वेधून घेतले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. “महाराष्ट्रात जे छुप्या पद्धतीने करण्यात आले, तेच पश्चिम बंगालमध्ये अधिकृत (Official) रित्या राबवून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे,” असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. सोमवारी सकाळी कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

९१ लाख मतदारांचा मुद्दा आणि संविधानाचे उल्लंघन
रोहित पवार यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करताना म्हटले की, “संविधानाच्या विरोधात जाऊन पश्चिम बंगालमधील जवळपास ९१ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. केवळ १५ टक्के मतदारांच्या जोरावर भाजप सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करत आहे. इतकी प्रतिकूल परिस्थिती असतानाही ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने लढा देत आहेत, ते कौतुकास्पद आहे. यावरूनच जनतेचा भाजपला असलेला विरोध स्पष्ट होतो.”

महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना सतर्कतेचा इशारा
बंगालमध्ये वापरण्यात आलेल्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेचा संदर्भ देत पवारांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सावध केले आहे. ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने एसआयआरच्या माध्यमातून मतदारांची कपात करण्यात आली, तसाच प्रकार महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात सर्वच राजकीय पक्षांनी ‘डोळ्यात तेल घालून’ सतर्क राहणे गरजेचे आहे.”

दक्षिणेतील निकालांचे स्वागत
केवळ बंगालच नव्हे तर तामिळनाडू आणि आसाममधील निकालांवरही त्यांनी भाष्य केले. तामिळनाडूमध्ये भाजपविरोधी पक्षांची आघाडी सरस ठरत असून, अभिनेते विजय यांच्या पक्षाला मिळणारा पाठिंबा हा बदलत्या राजकारणाचे संकेत असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या कलानुसार बंगालमध्ये भाजप १४९ जागांसह बहुमताच्या जवळ दिसत असला, तरी रोहित पवारांच्या या विधानामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!