Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न…! बिहार विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न…! बिहार विधानसभा निवडणूक निकालावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजारी अवस्थेतूनही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. डॉक्टरांनी त्यांना दोन महिन्यांचा कडक विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी नियमित घेतली जाणारी सकाळची पत्रकार परिषदही बंद ठेवली आहे. सार्वजनिक कार्यक्रम आणि कॅमेऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला पाळत असून, दोन महिन्यांनंतर पूर्णपणे बरा होऊन पुन्हा सक्रिय होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, बिहारमधील मतमोजणीचा वेग वाढत असताना संजय राऊत यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “या निकालांनी कुणीही आश्चर्यचकित होऊ नये. निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यातील समन्वय पाहता यापेक्षा वेगळ्या निकालाची अपेक्षा करणं चुकीचं ठरलं असतं. अगदी महाराष्ट्रातील निकालांसारखं चित्र पुन्हा पाहायला मिळालं. बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्नचं राबवण्यात आला आहे. ज्यांची सत्ता येण्याची शक्यता होती, त्यांना 50 च्याही आत रोखून धरण्यात आलं,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला वेग, पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?

महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुकीतही असंच चित्र दिसलं होतं. महायुतीनं एकतर्फी विजय मिळवत बहुमत मिळवलं होतं, तर महाविकास आघाडी फक्त 46 जागांवर थांबली. बिहारमध्येही त्याच धर्तीवर निकाल लागत असल्याची स्थिती आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपप्रणीत एनडीए सुमारे 195 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडीकडे केवळ 38 जागांचा आकडा आहे. भाजप 90 ठिकाणी पुढे आहे, जेडीयू 81 जागांवर आघाडीवर आहे. एलजेपी 20 आणि एचएएम 4 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे, लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीला 28, काँग्रेसला 5 आणि डाव्यांना 4 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!