Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल; काय आहे भेटीमागचं कारण? दाखल; काय आहे भेटीमागचं कारण?

सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर दाखल; काय आहे भेटीमागचं कारण? दाखल; काय आहे भेटीमागचं कारण?

मुंबई: बिहार निवडणुकीच्या निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भेट दिल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. निकाल लागण्याच्या दिवशी झालेली ही अनपेक्षित भेट राजकीय असल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात ही भेट वेगळ्याच कारणासाठी असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

बिहारमधील कलांनुसार एनडीएला सत्ता मिळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाची एकत्रित संख्या बहुमताच्या जवळ पोहोचत असल्याने नितीश कुमार यांच्यावर अवलंबित्व कमी होणार असल्याचेही राजकीय सूत्रांचे मत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध ठिकाणी नव्या राजकीय आघाड्या आणि चर्चांना उधाण आले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जवळीक वाढत असल्याची चिन्हे दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी एकत्र येण्याचा प्रस्ताव पाठवला होता, अशी माहिती अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यानंतर दोन्ही गट राज्याच्या पातळीवरही एकत्र येणार का, यावर चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – बिहार निवडणुकीच्या मतमोजणीला वेग, पहिला कल समोर; NDA की महागठबंधन, कोण आघाडीवर?

अशातच सुप्रिया सुळे वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र नंतर हे स्पष्ट झाले की त्या आपल्या भाचा, राष्ट्रवादी युवानेते युगेंद्र पवार यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी वर्षा निवासस्थानी गेल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लग्नपत्रिका देऊन विवाहसोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे दोन्ही बाजूंनी मौन बाळगले असले, तरी बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!