Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manoj Jarange : हिंदू धर्माच्या आडून मराठ्यांचा छळ का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना थेट सवाल

Manoj Jarange : हिंदू धर्माच्या आडून मराठ्यांचा छळ का? मनोज जरांगेंचा मोदी-शाहांना थेट सवाल

Manoj Jarange & Devendra Fadnavis : मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देणारे नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदू धर्म आणि सणांच्या नावाखाली मराठा समाजाची अडवणूक केल्याचा गंभीर आरोप करत, जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना थेट सवाल केला आहे.

“हिंदू धर्माच्या आडून मराठ्यांचा छळ का? फडणवीसांना यासाठीच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का?” बुधवारी (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले. येत्या 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

जरांगे यांनी फडणवीसांवर हिंदू सणांचा गैरफायदा घेऊन मराठा आंदोलकांना त्रास दिल्याचा आरोप केला. “आम्ही हिंदू आहोत, पण गणेशोत्सवासारख्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखले जात आहे. ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्वाची गरज आहे, ते खोटे हिंदू मराठ्यांवर अन्याय करत आहेत,” असं मनोज जरांगे यांनी सांगितले.

फडणवीसांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवीन कायदा आणल्याचा आणि मराठा मोर्चाला खीळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर दावा जरांगे यांनी केला. “काल दुपारी 3 वाजता निकाल आला आणि आज आम्हाला मुंबईला निघायचे आहे. फडणवीसांनी दहशतवाद्यांसारखे डाव खेळले. इंदिरा गांधींच्या काळातही आंदोलकांना असे अडवले नव्हते,” अशी खरमरीत टीका जरंगे यांनी केली.

कायदेशीर अडथळ्यांचा दावा

मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलनाला आझाद मैदानात परवानगी थेट नाकारलेली नसली, तरी 2025 च्या नव्या कायद्याच्या आधारे परवानगीसाठी अर्ज आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जरांगे यांनी सांगितले की, त्यांचे वकील परवानगीसाठी अर्ज करत असून, आंदोलन पूर्णपणे कायदेशीर मार्गाने होईल.

“आम्ही अनेक दिवसांपासून मुंबई मोर्चाची माहिती देत होतो. आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. तरीही फडणवीसांच्या लोकांनी याचिका दाखल करून नवीन कायदा पुढे केला आणि परवानगी नाकारली. आम्हाला नोटीसही देण्यात आली नाही. ही लोकशाही नाही,” असं त्यांनी ठणकावले.

ही आरपारची लढाई

जरांगे म्हणाले, आज आपण मुंबईकडे निघायचे आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होईल. सरकार आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करेल, खुनशी वागणूक देईल, पण आपण शांत राहायचे. ही आरपारची लढाई आहे. कितीही वेळ लागला, तरी संयम सोडायचा नाही. जगाच्या पाठीवर न झालेली ही लढाई शांततेने आणि डोक्याने जिंकायची आहे,” असं त्यांनी सांगितले

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!