Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Virar Building Collapse : मुंबईत मोठी इमारत दुर्घटना..! गणेश चतुर्थीच्या सणात माय-लेकीचा दुर्दैवी अंत; चिमुकलीच्या वाढदिवसाची लगबग अन् काळाचा घाला

Virar Building Collapse : मुंबईत मोठी इमारत दुर्घटना..! गणेश चतुर्थीच्या सणात माय-लेकीचा दुर्दैवी अंत; चिमुकलीच्या वाढदिवसाची लगबग अन् काळाचा घाला

मुंबई : गणेश चतुर्थीच्या उत्साहात देशभर रंगलेले असताना, विरारच्या नारंगी फाटा येथील रामू कंपाऊंड, स्वामी समर्थनगर येथील रमाबाई अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्याचा एक भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एका चिमुकलीचा पहिल्या वाढदिवसादिवशीच तिच्या आईसह दुर्दैवी अंत झाला, तर तिचे वडील अद्याप बेपत्ता आहेत.

माय-लेकीचा करुण अंत

ही दुर्घटना रमाबाई अपार्टमेंटच्या मागील भागात मध्यरात्री घडली. या घटनेत 24 वर्षीय आरती ओमकार जोयल आणि तिची एक वर्षाची मुलगी उत्कर्षा जोयल यांचा मृत्यू झाला. जोयल कुटुंबीय आपल्या चिमुकलीच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी करत असताना हा अपघात घडला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. चिमुकलीचे वडील अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) दोन तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आतापर्यंत 11 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना विरार आणि नालासोपारा येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी नऊ जण जखमी असून, त्यांच्यावर रिद्धी विनायक, प्रकृती, चांदनसर आणि संजीवनी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

वसईचे आमदार स्नेहा दुबे-पंडीत यांनी सांगितले की, सुमारे 20 ते 25 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. पालघरचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनीही याची पुष्टी केली आहे. बचावकार्यासाठी NDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिस युद्धपातळीवर काम करत असून, अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!