Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठा अपघात टळला! उड्डाणादरम्यान स्पाइसजेटच्या विमानाचे चाक तुटले; सर्व प्रवासी सुरक्षित

मोठा अपघात टळला! उड्डाणादरम्यान स्पाइसजेटच्या विमानाचे चाक तुटले; सर्व प्रवासी सुरक्षित

मुंबई: मुंबई विमानतळावर 12 सप्टेंबर रोजी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. गुजरातच्या कांडला विमानतळावरून मुंबईकडे निघालेल्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाच्या उड्डाणानंतर धावपट्टीवर त्याचे बाह्य चाक आढळून आल्याने प्रवाशांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ही गंभीर बाब समोर आल्यानंतर तातडीने विमानतळ प्रशासनाला सावध करण्यात आले. तथापी, विमानाने आपला प्रवास सुरू ठेवला. त्यानंतर विमानाने मुंबईत सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. विमानाने स्वतःच्या शक्तीने टर्मिनल गाठले. त्यानंतर विमानातील सर्व प्रवासी सुखरूप उतरले. एअरलाइनच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.

दरम्यान, विमानवाहतुकीतील बिघाडांच्या मालिकेत आणखी एक घटना दिल्ली विमानतळावर घडली. सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI2380 या फ्लाइटमध्ये एअर कंडिशनिंग सिस्टम आणि वीज पुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बोईंग 787-9 ड्रीमलाइनर विमान बुधवारी रात्री 11 वाजता दिल्लीहून उड्डाण करणार होते, मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रवास उशिरा सुरू झाला.

प्रवाशांनी सांगितले की, दोन तास विमानात बसवून ठेवलेल्यानंतर अखेर सर्व 200 हून अधिक प्रवाशांना विमानातून उतरवून टर्मिनल इमारतीत हलवण्यात आले. प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली असली तरी, एअरलाइनने त्वरित प्रवाशांना अल्पोपहार आणि जेवणाची सोय केली. एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करून कळवले की, प्रस्थानापूर्वी कूलिंग सिस्टीममध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाला. मात्र सर्व प्रवाशांना वेळोवेळी माहिती दिली जात होती आणि आवश्यक मदत पुरवली गेली.

दरम्यान, शेवटी विमान बदलण्यात आले आणि 13 सप्टेंबरच्या पहाटे 5:36 वाजता फ्लाइटने सिंगापूरकडे सुरक्षित उड्डाण केले. या घटनांमुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून, विमान कंपन्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!