Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cyclone Shakti ‘शक्ती’ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका, मुंबईसह सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Cyclone Shakti ‘शक्ती’ तीव्र चक्रीवादळात रूपांतरित; महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका, मुंबईसह सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

मुंबई : मान्सूननंतर अरबी समुद्रात निर्माण झालेले पहिले चक्रीवादळ ‘शक्ती’ आता तीव्र चक्रीवादळात (Severe Cyclonic Storm) रूपांतरित झाले असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर त्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी (4 ऑक्टोबर) जारी केलेल्या इशारावय वृत्तानुसार, द्वारकापासून सुमारे 420 ते 510 किलोमीटर अंतरावर हे वादळ सक्रिय असून, त्याच्या वाऱ्यांचा वेग ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे.

पुढील 24 तासांत ते पश्चिम-नैऋत्य दिशेने सरकून वायव्य आणि मध्य अरबी समुद्रात प्रवेश करेल, तर सोमवारपासून (6 ऑक्टोबर) ते कमकुवत होऊन ईशान्य दिशेने वळण्याची शक्यता आहे. या वादळामुळे गुजरात आणि उत्तर महाराष्ट्रात समुद्र खवळले असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी उच्च ते मध्यम स्तराचा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, ‘शक्ती’ चक्रीवादळ 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता उत्तर-पश्चिम आणि उत्तर-पूर्व अरबी समुद्रात केंद्रित होते, जे द्वारकापासून 510 किमी पश्चिमेला होते. ते ताशी 13 ते 18 किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत असून, 5 ऑक्टोबरपर्यंत वायव्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्रात पोहोचेल. त्यानंतर 6 ऑक्टोबरच्या सकाळी ते पूर्व-उत्तर-पूर्व दिशेने वळून हळूहळू कमकुवत होईल.

महाराष्ट्रावर होणारे परिणाम

‘शक्ती’ चक्रीवादळाचे प्रभाव महाराष्ट्रातही जाणवत असून, 3 ते 7 ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनाऱ्यावर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबईत हलका सरीसरी पाऊस पडण्याची शक्यता असली, तरी पालघरमध्ये 8 ऑक्टोबरला मुसळधार पावसाचा धोका आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, उत्तर कोकणातील सखल भागात पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असून, गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि पाकिस्तानी किनारपट्टीवर 5 ऑक्टोबरपर्यंत खवळी ते अतिखवळी स्थिती कायम राहील.

समुद्र खवळलेला, मच्छिमारांना इशारा

वादळामुळे रविवार (5 ऑक्टोबर) पर्यंत गुजरात, उत्तर महाराष्ट्र आणि पाकिस्तानी किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील, तर 7 ऑक्टोबरपर्यंत जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि उसळ्या उसळ्या येण्याची शक्यता आहे. IMD ने मच्छिमारांना 6 ऑक्टोबरपर्यंत (मंगळवार) वायव्य, पूर्व-उत्तर आणि मध्य अरबी समुद्रात, तसेच गुजरात-उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर जाण्यापासून मनाई केली आहे. समुद्रातील उच्च लाटा आणि जोरदार वाऱ्यांमुळे धोका वाढला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!