Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Uddhav Thackeray: कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना संपवून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना खुलं आव्हान

Uddhav Thackeray: कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना संपवून दाखवा; उद्धव ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना खुलं आव्हान

Uddhav Thackeray: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या विजयोत्सवावर टीकेची झोड उठवली आहे. ‘सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक लोकशाही पायदळी तुडवून, साम-दाम-दंड-भेदाचा वापर करून लढवली. आमचा आकडा कदाचित कमी असेल, पण आमच्या पराजयालाही एक तेज आहे, तर तुमचा विजय हा भ्रष्टाचाराने डागाळलेला आहे. कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना संपवून दाखवा,’ असं आव्हान यावेळी ठाकरेंनी भाजपला आणि शिंदे गटाला दिलं.

‘खुर्च्यांनी मतदान केलं का?’ सभेतील गर्दीवरून टोला

निवडणूक निकालातील गणितावर शंका उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या सभेला झालेली विराट गर्दी आणि दुसऱ्या दिवशी महायुतीच्या सभेतील रिकाम्या खुर्च्या यांचे गणित जुळत नाही. “जर तुमच्या सभांना माणसं नव्हती, तर मग तुम्हाला मतदान काय रिकाम्या खुर्च्यांनी केलं का?” असा खोचक सवाल त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला.

पैशांचा पाऊस आणि यंत्रणेचा गैरवापर

निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकारांवर बोट ठेवत ठाकरेंनी गंभीर आरोप केले. गेल्या ४ वर्षांत विकासनिधीच्या नावाखाली आमदारांना आणि नगरसेवकांना अमाप पैसा वाटण्यात आला. निवडणुकीच्या काळात साड्या आणि मिक्सरचे वाटप करून मते विकत घेण्याचा प्रयत्न झाला. हा हजारो कोटींचा पैसा येतो कुठून? या पैशांच्या स्त्रोताची चौकशी करण्यासाठी ईडी, सीबीआय किंवा आयकर विभाग सत्ताधाऱ्यांच्या मागे का लागत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मोदींच्या नोटाबंदीच्या अपयशावरही त्यांनी टीका केली.

हेही वाचा –PMC Election Winners List: पुण्यात ‘कमळ’ फुललं! भाजपचा 119 जागांसह ऐतिहासिक विजय; वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

‘कागदावरची शिवसेना नव्हे, जमिनीवरची शिवसेना महत्त्वाची’

भाजपने पक्ष फोडून कागदावर शिवसेना संपवल्याचा दावा केला असला तरी, जमिनीवर शिवसेना आजही भक्कम असल्याचे ठाकरेंनी ठणकावून सांगितले. ज्यांनी छळवणूक, तडीपारीच्या नोटिसा आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडता ‘शिवशक्ती’ला साथ दिली, तेच खरे लोकशाहीचे रक्षक आहेत. भाजप जमिनीवर असता, तर त्यांना आमचे नगरसेवक फोडावे लागले नसते,’ असेही ते म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!