Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मराठा आरक्षणासंदर्भातील GR ला उच्च न्यायालयात आव्हान; 2 जनहित याचिका दाखल, छगन भुजबळही ठोठावणार कोर्टाचा दरवाजा

मराठा आरक्षणासंदर्भातील GR ला उच्च न्यायालयात आव्हान; 2 जनहित याचिका दाखल, छगन भुजबळही ठोठावणार कोर्टाचा दरवाजा

मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात मुंबईत आझाद मैदानात आंदोलन छेडले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या बेमुदत उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि सरकारवर तीव्र दबाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर सरकारने 2 सप्टेंबर 2025 रोजी ‘हैदराबाद गॅझेटियर’च्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास मान्यता देणारा शासकीय निर्णय (GR) जाहीर केला होता.

मात्र, या GRला आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात दोन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. पहिली याचिका ‘शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना’च्या वतीने तर दुसरी वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे. याचिकांमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, 2 सप्टेंबर रोजीची अधिसूचना बेकायदेशीर आहे. हैदराबाद गॅझेटियरचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनात्मक तरतुदींना विरोधी ठरते. त्यामुळे हा GR रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

छगन भुजबळ ठोठावणार न्यायालयाचा दरवाजा

याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला विनंती केली आहे की, अंतिम निर्णय होईपर्यंत या GR ची अंमलबजावणी थांबवावी. तसेच कुणालाही प्रमाणपत्र देऊ नये. या याचिकांवरील सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या GRला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या टीमकडून सध्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते स्वतः उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!