Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पहलगाम हल्ल्याप्रकरणी ठाकरे गट शिवसेनेची आक्रमक भूमिका; महिला शाखा राज्यात ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन करणार

पहलगाम हल्ल्याप्रकरणी ठाकरे गट शिवसेनेची आक्रमक भूमिका; महिला शाखा राज्यात ‘सिंदूर रक्षा’ आंदोलन करणार

मुंबई: पहलगाम हल्ल्यात झालेल्या 26 नागरिकांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (PoJK) मधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या कारवाईला देशभरातून समर्थन मिळाले असून, याला शहिदांचा बदला मानले जात आहे. दरम्यान, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर तीव्र निशाणा साधला. त्यांनी म्हटलं आहे की, ‘पहलगाम हल्ल्यात 26 मातांचे सिंदूर पुसले गेले. हा संताप अजूनही शांत झालेला नाही. दहशतवादी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही.’

भाजपवर देशद्रोहाचा आरोप –

तथापि, 14 सप्टेंबर रोजी अबू धाबीमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळवला जात असल्याची टीका करत त्यांनी भाजपवर देशद्रोहाचा आरोप केला. भाजपच्या मंत्र्यांची मुले हा सामना पाहायला जातील, हा थेट देशद्रोह आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे. या विरोधात शिवसेना (UBT) महिला आघाडी रविवारी ‘सिंदूर रक्षा आंदोलन’ करणार असून, महाराष्ट्रातील हजारो महिला आपल्या घरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवतील, अशी घोषणाही त्यांनी केली.

नेपाळातील आंदोलनांचा संदर्भ देत राऊत यांनी इशारा दिला की, ‘नेपाळमध्ये भ्रष्टाचार, हुकूमशाही आणि घराणेशाहीविरुद्ध जी आग लागली आहे, तीच परिस्थिती भारतातही उद्भवू शकते. त्यांनी आरोप केला की, सध्या मोदी सरकार केवळ महात्मा गांधींच्या अहिंसक विचारसरणीमुळे टिकून आहे. तुम्ही गांधींना कितीही शिव्या दिल्या तरी मोदीजी, तुमचे सरकार गांधींच्या विचारांमुळेच उभे आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्राच्या परराष्ट्र धोरणावरही प्रश्न उपस्थित केले. नेपाळ एकेकाळी आपला जवळचा मित्र देश होता. संकटाच्या वेळी भारताने मदत केली नाही, हे परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी बेरोजगारी, मोफत रेशन योजना, आणि श्रीमंत नेत्यांच्या परदेशातील मुलांचा मुद्दा उपस्थित करून केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!