Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raj Thackeray-Uddhav Thackeray Sabha: नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची जोरदार फटकेबाजी; पक्षांतर, बिनविरोध निवडणूकीवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Raj Thackeray-Uddhav Thackeray Sabha: नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची जोरदार फटकेबाजी; पक्षांतर, बिनविरोध निवडणूकीवरून राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Raj Thackeray-Uddhav Thackeray Sabha: महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये आयोजित सभेमध्ये बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपावर पक्षांतरावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील उपस्थिती आहे.

निवडणुका रखडल्या? उत्तर हवं

आज अनेक वर्ष निवडणुका रखडल्या, का रखडल्या? याची कारणं कुणालाही देता येणार नाही, सांगता येणार नाही, कारणं कळलीच नाही. इतकी वर्ष निवडणुकीला का लागले? कशासाठी लागले? चार वर्षांपूर्वी मुदत संपल्यावरही निवडणुका होत नव्हत्या. का होत नव्हत्या याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सध्या महाराष्ट्रात गोंधळ सुरू आहे. कोण कुठं चाललंय कोण काय चाललंय मागे एकदा म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात आहे हेच कळत नाही. प्रत्येकाला विचारावं लागतं आज कुठे? काही जण वेडेपिसे झाले, त्या दिवशी कळलं एकाने छाननीच्या वेळी समोरच्याचा एबीफॉर्म घेतला आणि गिळला, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

बिनविरोध निवडणूकीवरून हल्लाबोल

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, वेळ नव्हता, दिवस नव्हता, एखादा दिवस असता तर सकाळी तरी एबी फॉर्म बाहेर पडला असता. तीही वेळ दिली नाही. कोणत्या थराला गेल्या आहेत निवडणुका? बिनविरोध निवडून येतात, तिकडच्या लोकांना मतदानाचा अधिकारही त्यांना देणार नाही का? काहीवेळा दहशतीतून, काही वेळा पैसे देऊन, आकडे ऐकतोय कुणाला एक कोटी, कुणाला पाच कोटी, कल्याण डोंबिवलीत प्रभागात एका घरातील तिघे उभे आहेत, त्यांना काय ऑफर झाली असेल? एका प्रभागातील तिन जणांना १५ कोटी रुपयांची ऑफर झाली. कुणाला पाच कोटी, कुणाला दोन कोटी, येतात कुठून एवढे पैसे? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.

भीती घालायची, दहशत करायची आणि अशा वातावरणात निवडणुका घेता. नाशिकमध्येही भाजप तुमच्याकडे माणसं होती ना? म्हणजे ५२ साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ नावाने त्याला २०२६ ला पोरं भाड्याने घ्यावे लागतात. तुमची माणसं उभी केली होती ना? मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचत आहात, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!