Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘प्रितम ताईंनी रेल्वे आणली आता मी…’; पंकजा मुंडेंनी बीडसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

‘प्रितम ताईंनी रेल्वे आणली आता मी…’; पंकजा मुंडेंनी बीडसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Pankaja Munde Dasara Melava: बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान गडावर झालेल्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यंदाही मोठ्या संख्येने गर्दी झाली. या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पाणी प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. प्रीतम ताईंनी रेल्वे आणली, आता मी पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेसाठी महत्त्वाची घोषणा केली.

मेळाव्याच्या सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या दर्शनाचा उल्लेख करत भावनिक भाष्य केले. लोक विचारत होते, यंदा दसरा मेळावा होणार का? पण मी तर भगवान बाबांच्या दर्शनालाच आले. माझे वडील दरवर्षी येथे मेळाव्यात सहभागी व्हायचे. एकदा मला गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला होता, पण त्यानंतर मी पुन्हा गडावरच येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सावरगाव हे भगवान बाबांचे जन्मगाव असल्याचे स्मरण करून देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, येथे उभी राहिलेली बाबांची मूर्ती माझ्या कार्यकर्त्यांच्या श्रमातून साकारली आहे. यामध्ये शासकीय निधीचा हातभार नाही, तर ऊसतोड कामगारांच्या घामाचे श्रम दडलेले आहेत. मुंडे साहेबांचा वारसा पुढे नेण्याचे माझे वचन आहे. मी माझ्या लोकांना मान खाली घालू देणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जात सर्व समाजघटकांसाठी आपण लढत राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा – Dhananjay Munde Dasara Melava: ‘याच्या ताटातलं काढून त्याच्या ताटात करू नका’; मराठा आरक्षणावर धनंजय मुंडेंच वक्तव्य, दसरा मेळाव्यात काय काय म्हणाले?

सत्तेत असो वा नसो, मी १८ पगड जातींसाठी आवाज उठवत राहणार आहे. काल मी धनगर समाजाच्या आरक्षण चळवळीत त्यांच्या सोबत होते. मराठा आरक्षणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या हक्कातून कोणीही ओढून घेऊ नये हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. गांधी लवकर झोपत, बाबासाहेब मात्र जागे असायचे. कारण त्यांचा समाज झोपलेला होता. आज मलाही तसंच वाटतं. प्रीतमने रेल्वे आणली, पण पाणी मिळाल्याशिवाय मला झोप लागणार नाही, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!