Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पुण्यात ACB ची मोठी कारवाई! 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

Pune Crime: पुण्यात ACB ची मोठी कारवाई! 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

Pune Crime: पुण्यातील सहकार क्षेत्राला हादरवणारी घटना उघड झाली असून, आठ कोटींची लाच मागणी करणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. पहिल्या हप्त्याच्या रूपाने ३० लाख रुपये स्वीकारताना दोघांना शनिवार पेठेतील एका कार्यालयाबाहेर अटक करण्यात आली. धनकवडी परिसरातील एकता सहकारी संस्थेच्या जमिनीशी संबंधित प्रकरणावरून हा संपूर्ण प्रकार घडला. २००५ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत ३२ सभासद असून, २०२० पासून अंतर्गत वाद वाढल्याने प्रशासकीय हस्तक्षेपाची वेळ आली. यानंतर २०२४ मध्ये सहकार विभागाने विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नियुक्ती केली होती.

ACB ने दोघांना रंगेहात पकडलं

तक्रारीनुसार, देशमुख यांनी सभासदांना शेअर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तब्बल तीन कोटींची लाच मागितली. संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असल्यास आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. या एकूण आठ कोटींच्या व्यवहारातून ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना देशमुख आणि त्यांच्या सोबतीला ऑडिटर भास्कर पोळ हे दोघे जाळ्यात अडकले.

हेही वाचा –पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांची स्पष्ट भूमिका

एसीबीने रचला सापळा

दरम्यान, ५ डिसेंबर २०२५ रोजी तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. तपासादरम्यान मागणी खरी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तक्रारदाराच्या कार्यालयासमोर पंचांसमोर रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी दोघांना ताब्यात घेतले. अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या इतिहासात लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागण्याची ही पहिलीच नोंदवलेली घटना असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!