Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election 2025 : पुण्यात अजितदादांना भारी पडले मुरलीआण्णा, अजितदादांची आर्जव भाजपाने फेटाळली

PMC Election 2025 : पुण्यात अजितदादांना भारी पडले मुरलीआण्णा, अजितदादांची आर्जव भाजपाने फेटाळली

पुणे : पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीच्या तोंडावर अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून, यात केलेल्या किरकोळ बदलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या ‘स्वस्ती’ने प्रभागरचना तयार झाल्याचा आरोप करून दोनवेळा नाराजी व्यक्त केल्यानंतरही, अंतिम रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित फायदा मिळाला नाही.

उलट, हे बदल भाजपला अधिक फायदेशीर ठरले असून, राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) सारख्या विरोधी पक्षांना कोंडीत पकडण्यात महारत दाखवली गेली. ४ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या या रचनेत ३२ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले, पण ते ‘दिखावे’साठी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रारूप रचनेवरून अजित पवार नाराज

ऑगस्ट २०२५ मध्ये जाहीर झालेल्या प्रारूप प्रभागरचनेत ४१ प्रभाग आणि १६५ नगरसेवकांची रचना होती, यामध्ये नागरिक आणि पक्षांकडून २,५०० हून अधिक हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी नेत्यांनी हे आरोप केले की, भाजपने रचना स्वतःच्या सोयीनुसार तयार केली आहे. यावर अजित पवार यांनी मोहोळ यांच्यावर थेट नाराजी काढली आणि त्यांची तुलना माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी केली, यामुळे महायुतीत तणाव वाढला. पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना प्रभागरचना प्रक्रियेत ‘विश्वासात घेण्याचे’ आश्वासन मिळाल्याचे सांगितले होते. मात्र, अंतिम रचनेत हे बदल फक्त दिखाव्यासाठी ठरले, यामुळे पवार यांच्या प्रयत्नांना अपयश आले.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांवर हल्ला

अंतिम रचनेत हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या राष्ट्रवादी-प्रभावित विधानसभा मतदारसंघांतील काही प्रभागांमध्ये किरकोळ सीमापरिवर्तन करण्यात आले आहे. हडपसरमध्ये माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या प्रभावक्षेत्रातील भाग पाच प्रभागांमध्ये विभागला गेला, ज्यामुळे त्यांना प्रभाग निवडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या टिंगरेनगर गल्ली क्रमांक १४ आणि बार्माशेल झोपडपट्टी या भागांना विमाननगर प्रभागाशी जोडण्यात आले. यामुळे टिंगरे यांच्या प्रभागाची ताकद कमी झाली, तर त्यांचे विरोधक मुळीक आणि पठारे यांच्यासाठी हा प्रभाग अधिक सुरक्षित झाला.

२०१७ च्या PMC निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) ला मोठे मताधिकार मिळालेल्या भागांचे विभाजन करून ते भाजप-समर्थक भागांशी जोडण्यात आले, ज्यामुळे विरोधकांना अडचणी येणार आहेत. शिवसेना (UBT), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या इच्छुक उमेदवारांना देखील प्रभागरचनेत फटका बसला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!