Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune: कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच निवडणूक जिंकता येते; प्रभाग क्रमांक 10 मधील चारही उमेदवारांचे एकमत

Pune: कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच निवडणूक जिंकता येते; प्रभाग क्रमांक 10 मधील चारही उमेदवारांचे एकमत

पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील प्रचार सध्या वेग घेत आहे. बावधन परिसरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली असून, या प्रभागातील चारही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणूक जिंकता येते असे एकमुखाने मान्य केले आहे. येथे भाजपकडून किरण दगडे, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे, दिलीप वेडे पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

प्रभागातील विविध भागांत पदयात्रा, घरोघरी भेटी आणि छोट्या सभांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. या वेळी उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होत असून, नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे खरे काम कार्यकर्ते करत असल्याने त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.

यावेळी किरण दगडे यांनी सांगितले की, “कार्यकर्ते हे निवडणुकीतील खरी ताकद आहेत. परिसरातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासकामांचा आढावा ते सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या मेहनतीशिवाय विजय शक्य नाही.”

रूपाली सचिन पवार यांनी नमूद केले की, “ “कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ आहेत. प्रत्येक परिस्थितीत ते मतदारांपर्यंत पोहोचतात. मतदारांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे काम कार्यकर्ते करत असतात. निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून संपूर्ण संघाची लढाई असते. प्रभागातील प्रत्येक समस्या कार्यकर्त्यांमुळेच आम्हाला कळते. तेच आमचे डोळे आणि कान आहेत. असे देखील पवार यांनी म्हटले.

दिलीप वेडे पाटील यांनी स्पष्ट केले की, “मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांची विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकण्याची ताकद मिळते.”

अल्पना गणेश वरपे यांनी सांगितले की, “प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रश्नांची माहिती कार्यकर्त्यांमुळेच मिळते. त्यामुळे योग्य नियोजन करता येते.” तर दिलीप वेडे पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “कार्यकर्त्यांची विश्वासार्हता आणि जनसंपर्क हीच निवडणुकीची खरी शिदोरी आहे.”

दरम्यान, प्रचारादरम्यान बावधन परिसरातील नागरिकांनी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षिततेसारखे प्रश्न उमेदवारांसमोर मांडले. या सर्व मुद्द्यांवर उपाययोजना करण्याची आश्वासने उमेदवारांकडून देण्यात आली.

प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदाची निवडणूक चुरशीची होणार असून, कोणाला मतदारांचा कौल मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या प्रचारातून एक गोष्ट ठळकपणे समोर येत आहे. या निवडणुकीत विजयाची गुरुकिल्ली कार्यकर्त्यांच्या मेहनतीतच दडलेली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!