Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यातील पहिला गँगवॉर अन् आंदेकर टोळीचा रक्तरंजित चार दशकांचा इतिहास; वाचा

पुण्यातील पहिला गँगवॉर अन् आंदेकर टोळीचा रक्तरंजित चार दशकांचा इतिहास; वाचा

पुणे : पुण्याच्या गल्लीबोळातून उदयास आलेली आंदेकर टोळी गेल्या चार दशकांपासून दहशत आणि रक्तपाताची प्रतीक ठरली आहे. अलीकडेच माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला म्हणून या टोळीने नाना पेठेत १९ वर्षीय आयुष कोमकरवर बेभान गोळीबार केला. “टपका रे टपका” या गाण्याच्या तालावर नाचत हल्लेखोरांनी आयुषवर ११-१२ गोळ्या झाडल्या, ज्यातून तीन गोळ्या लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आंदेकर टोळीतील आठ जणांना अटक केली असून, या घटनेने पुण्याच्या अंडरवर्ल्डमधील या टोळीचा रक्तरंजित इतिहास पुन्हा समोर आला आहे.

१९८० च्या दशकात उदय: पुण्यातील पहिला गँगवॉर

१९८० च्या दशकात पुणे शहरात छोट्या-मोठ्या टोळ्यांचा बोलबाला होता. जुगार अड्डे, अवैध दारू विक्री आणि खंडणी हे त्यांचे प्रमुख व्यवसाय होते. सायकल चेन, रामपूरी चाकू, तलवारी आणि सोडा बाटल्या यांसारख्या साध्या शस्त्रांनी टोळ्या वर्चस्व प्रस्थापित करत होत्या. याच काळात बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकरच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळी उदयास आली. नाना पेठ, भवानी पेठ आणि गंज पेठ या भागात त्यांनी दहशत निर्माण केली. बाळूने १९७० च्या दशकात स्थानिक गुंडावर चाकूने हल्ला करून आपले नाव कमावले आणि टोळीची स्थापना केली.

१९८४ मध्ये पुण्याच्या गुन्हेगारी इतिहासातील पहिला मोठा गँगवॉर घडला. शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात प्रमोद माळवडकरने बाळू आंदेकरची गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला होती. या घटनेने आंदेकर आणि माळवडकर टोळ्यांमधील वैर पेटले, ज्याचा परिणाम पुढील दशकभर रक्तरंजित हिंसाचारात दिसला. या वादात सहा गुंड मारले गेले आणि अनेक हल्ले झाले. १९९७ मध्ये पुणे क्राइम ब्रँचने काळेवाडी येथे प्रमोद माळवडकरचा एनकाऊंटर केला, ज्यामुळे माळवडकर टोळी संपुष्टात आली. मात्र, बाळूचा भाऊ सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरने टोळीची सूत्रे हाती घेतली आणि पुण्याच्या अंडरवर्ल्डवर वर्चस्व प्रस्थापित केले.

२००९ मध्ये टोळीला खीळ, पण पुन्हा सक्रिय

२००९ मध्ये बंडू आणि त्याच्या सहकाऱ्यांना शहराबाहेर हाकलण्यात आले. मात्र, बंडू परतल्यावर टोळी पुन्हा सक्रिय झाली. बंडूवर फरासखाना पोलीस स्टेशनशी संबंधित खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात गेल्याने टोळी काहीशी कमकुवत झाली, पण वनराज आणि कृष्णा आंदेकर यांनी धुरा सांभाळली. बंडूला २०२३ मध्ये MCOCA अंतर्गत अटक झाली होती, पण जानेवारी २०२५ मध्ये जामिनावर सोडण्यात आले.

राजकारणात प्रवेश

१९९७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत आंदेकर कुटुंबाने राजकारणात पाऊल टाकले. बंडूची बहीण वत्सला आंदेकर १९९८-९९ मध्ये पुण्याची महापौर बनली, जिला “अक्का” म्हणून ओळखले जाते. तिने गुन्हेगारीपासून दूर राहून राजकारण केले, पण टोळीच्या इतर सदस्यांनी हिंसाचार सुरूच ठेवला. उदयकांत आंदेकर (१९९२ मध्ये नगरसेवक), राजेश्री आंदेकर (२००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका) आणि वनराज आंदेकर (२०१७ मध्ये NCP चे नगरसेवक) यांनी टोळीचे नाव पुढे नेले. मात्र, राजकारण हे केवळ बाह्य आवरण होते; मागे गुन्हेगारीचे जाळे कायम होते. कुटुंबाने काँग्रेस आणि NCP शी संबंध जोडले.

वनराज आंदेकरची हत्या

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेत वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली. रात्री ९ वाजता डोके तालिमजवळ वनराज चुलत भाऊशी बोलत असताना १०-१५ हल्लेखोरांनी सहा बाइकवर येऊन हल्ला केला. पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोके फोडून त्याला ठार मारले. हल्लेखोरांनी रस्त्याची वीज खंडित करून हल्ला केला. या हत्येमागे कौटुंबिक वाद आणि आंदेकर टोळीतील अंतर्गत संघर्ष कारणीभूत होता.

वनराजच्या दोन बहिणी संजीवनी आणि कल्याणी यांचा त्यांच्या पती जयंत आणि गणेश कोमकर यांच्याशी वाद होता. संजीवनीच्या दुकानावर अतिक्रमणविरोधी कारवाई झाली होती, ज्यात वनराजचा हात असल्याचा संशय होता. ३१ ऑगस्टला पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या वादात संजीवनीने वनराजला धमकी दिली होती. त्यानंतर सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभाते यांनी हत्येचा कट रचला. गायकवाडने २०२१ मध्ये आंदेकर टोळी सोडून स्वतःची गँग उभी केली होती. २०२३ मध्ये त्याचा मित्र निखिल अखाडेचा खून आंदेकर टोळीने केला होता, त्याचा बदला म्हणून गायकवाड कटात सामील झाला. पोलिसांनी २१ आरोपींवर चार्जशीट दाखल केली असून, संजीवनी, जयंत, गणेश आणि गायकवाड यांना अटक झाली. गणेश कोमकर नागपूर कारागृहात आहे.

खुनाचा बदला खुनाने

वनराजच्या हत्येच्या ठीक एका वर्षानंतर, ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत पुन्हा रक्त सांडले. १९ वर्षीय आयुष कोमकर, जो वनराजचा भाचा होता, क्लासमधून परतत असताना लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या बेसमेंट पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी ९-११ गोळ्या झाडल्या. आयुषचा जागीच मृत्यू झाला. या हत्येने वनराजच्या खुनाचा बदला पूर्ण झाला. आयुषचा वडील गणेश कोमकर वनराज हत्येचा मुख्य आरोपी आहे.

पोलिसांनी अमन युसूफ पठाण उर्फ खान (शूटर), यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, सुजल राहुल मेरगू यांना अटक केली. बंडू आंदेकर, त्याची मुलगी, दोन नातवंडे, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातून अटक झाली. एकूण १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमन आणि यशने गोळीबार केल्याचे दिसते. बंडूवर १७ गुन्हे, कृष्णावर ७ गुन्हे आहेत. पोलिसांनी बंडूच्या जामिनाविरोधात सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!