Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यातील 6 कॅण्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण! पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामठीचा समावेश

राज्यातील 6 कॅण्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण! पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामठीचा समावेश

पुणे: पुणे, खडकी कटक मंडळाचे (कॅण्टोन्मेंट बोर्ड) पुणे महापालिकेमध्ये, औरंगाबाद कटक मंडळाचे छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये, देवळाली व अहमदनगर कटक मंडळ स्वतंत्र नगरपालिका, तर कामठी कटक मंडळ येरखेडा नगरपंचायतीमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. या कटक मंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांत समावेश झाल्याने नागरी सुविधा तसेच इतर विकास होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधान भवन येथे राज्यातील कॅण्टोन्मेंट बोर्डाचे नगरपालिका, महापालिका क्षेत्रात विलीनीकरणाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, व्हीसीद्वारे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, जिल्हाधिकारी पुणे, ‘पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीगर, अहिल्यानगर, पुणे दक्षिण कमांडचे संचालक संबंधित महानगरपालिकांचे आयुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी, पुणे, खडकी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, देहू रोड कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

डीपीसीमधून निधी देणार : अजित पवार

पुणे, खडकी, देवळाली, छत्रपती संभाजीनगर, कामठी, अहमदनगर या कटक मंडळाचा समावेश झाल्याने जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून या परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी दिला जाईल. संबंधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!