Today बुधवार, 11th फेब्रुवारी 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे- नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान धावणार उन्हाळी गाड्या

पुणे- नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान धावणार उन्हाळी गाड्या

पुणे: मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष गाड्‌या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबासमवेत किंवा मित्र-मंडळींबरोबर बाहेरगावी, तसेच पर्यटनस्थळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. त्यामुळे आरक्षण केंद्रावर तिकीट बुकिंग सुरू होताच रेल्वे तिकीट वेटिंगवर जाते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या सर्व रेल्वे गाड्‌या येत्या ४ एप्रिलपासून २१ जूनपर्यंत नियोजनानुसार सोडण्यात येणार आहेत.

पुणे-नागपूर- पुणे साप्ताहिक अति जलद वातानुकूलित विशेष गाडीच्या ८ एप्रिल ते २४ जून दरम्यान एकूण २४ फेऱ्या होतील. साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०१४६९) गाडी पुणे येथून दर मंगळवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ट्रेन नागपूरला पोहचणार आहे.

वातानुकूलित विशेष (ट्रेन क्रमांक ०१४७०) ग्राडी नागपूर येथून दर बुधवारी सकाळी आठ वाजता सुटणार असून, पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहचणार आहे. या गाडीला तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ सामन्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक वॉन आणि १ जनरेटर व्हॅन असणार आहे.

पुणे-नागपूर- पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांच्याही २४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी (ट्रेन क्रमांक ०१४६७) ९ एप्रिल ते २५ जूनदरम्यान आठवड्याच्या दर बुधवारी पुणे येथून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहचणार आहे. साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०१४६८) १० एप्रिल ते २६ जूनदरम्यान आठवड्‌याच्या दर गुरुवारी सकाळी आठ वाजता नागपूर येथून सुटणार असून, पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहचणार आहे. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, ५ शमनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे. या गाड्‌यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!