Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

पुरंदर विमानतळासाठी सात गावांतील सातबारावर शेरे मारण्यास सुरुवात; राज्य शासनाची अधिसूचना जाहीर

पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शेरे मारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही हरकती-सूचना असतील, तर त्या लेखी स्वरुपात नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. आलेल्या हरकतींवर संबधित भूसंपादन अधिकारी सुनावणी घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अधिनियम १९६२ च्या कलम ३२ (२) ची अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे.

पुरंदर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर या अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाची ३२ (२) ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याचा व पाहणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आता संबधित गावातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंधणे घालण्यात आली आहे. आता जमिन मालकांना भूसंपादनाची नोटीसा बजावण्यात येत आहे. यानुसार शेतकऱ्यांना याबाबत हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एखतपूर, खानवडी आणि मुंजवडी या तीन गावांतील शेतकऱ्यांना २५ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. तर वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि पारगाव या चार गावांतील शेतकऱ्यांना २९ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांनी विमानतळाबाबत केलेल्या हरकतींवर संबंधित अधिकारी सुनावणी घेणार आहेत.

विमानतळासाठी सर्वाधिक क्षेत्र पारगावमधील संपादित होणार

पुरंदर विमानतळासाठी सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार आहे. या गावातील १ हजार ५४२ सर्व्हे नंबरमधील ९७२ हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्या खालोखाल खानवडी गावातील ३८१ सर्व्हे नंबरमधील ४५१ हेक्टर जागा, कुंभारवळणमधील ४२४ सर्व्हे नंबर बाधित होत असून या गावातील ३४१ हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे. वनपुरी गावातील ३६२ सर्व्हे नंबर बाधित होत असून त्यातील ३३० हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील १९९ सर्व्हे नंबरमधील २४० हेक्टर जमीन, एखतपूरमधील १४५ सर्व्हेनंबर बाधित होत असून त्यातील २१४ हेक्टर आणि मुंजवडीमधील २२१ सर्व्हे नंबरमधील १२२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!