Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बळीराजा पुन्हा संकटात

Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचा कहर; ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बळीराजा पुन्हा संकटात

Unseasonal Rain : महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत अवकाळी पावसाने थैमान घातले असून विविध दुर्घटनांमध्ये ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अनियमित पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.

राज्यातील विविध ठिकाणी वीज कोसळणे आणि बांधकाम कोसळण्याच्या घटनांमुळे जीवितहानी झाली आहे. जालना जिल्ह्यात वीज कोसळून दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे भिंत कोसळून १४ वर्षीय मुलाचा जीव गेला. साताऱ्यात एका महिलेचा तर अहिल्यानगरमध्ये शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला.

नाशिकमधील मालेगावच्या वनपट गावात यश शिंदे हा आठवीचा विद्यार्थी गुरांच्या शेडजवळ उभा असताना अचानक भिंत कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील खंडाळा तालुक्यात वीज कोसळून 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात दोन तरुणांचा वीज पडून मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात विजा कडाडत असताना नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हवामान विभागाने पुढील २ ते ३ दिवस राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला असून मराठवाडा, खानदेश आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे आणि विशेषतः विजांच्या कडकडाटावेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!