Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ahilyanagar News : धक्कादायक! केमिकलने पिकवलेले आंबे जीवावर बेतले, आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 7 जण…

Ahilyanagar News : धक्कादायक! केमिकलने पिकवलेले आंबे जीवावर बेतले, आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 7 जण…

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात धक्कादायक प्रकार समोर आला असून, आंब्याचा रस सेवन केल्यानंतर एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. अचानक चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
शेवगाव शहरातील आरे वस्ती येथे राहणाऱ्या जायभाय कुटुंबाने बाजारातून आंबे खरेदी केले होते. घरातील सदस्यांनी त्या आंब्यांचा रस तयार करून सेवन केला. मात्र काही वेळातच कुटुंबातील सदस्यांची प्रकृती बिघडू लागली. सुरुवातीला त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं, पण तब्येत अधिक खालावल्याने पुढे अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, संबंधित आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’सारख्या रसायनांचा वापर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रसायन ओलाव्याच्या संपर्कात आल्यानंतर ‘अॅसिटिलीन’ वायू निर्माण होतो, जो आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा प्रकारे फळे पिकवणे कायद्याने बंदीस्त आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे ही रासायनिक विषबाधेशी संबंधित असू शकतात. सुदैवाने उपचारानंतर सातपैकी सहा जणांना घरी सोडण्यात आलं असून एका रुग्णावर अद्याप उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनही सतर्क झालं आहे. पाथर्डी परिसरात केमिकलचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याच्या संशयावरून आरोग्य विभाग आणि पंचायत समितीकडून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. फळविक्रेत्यांकडून आंब्यांचे नमुने जप्त करण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना आंबे खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. अतिशय चमकदार, एकसारखा पिवळा रंग असलेले किंवा कृत्रिम वास येणारे आंबे खरेदी टाळावेत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!